शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीरच्या दंगलीनंतर तणावपूर्ण वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 11:09 IST

५४ जणांविरुध्द गुन्हा दाखल : रविवारी पहाटेची कारवाई, संशयितांची धरपकड

ठळक मुद्देरविवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोनही गटातील प्रमुखांची एकत्रित शांतता समितीची बैठक घेण्यात आली़शांतता ठेवण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. खºया दोषींवर कठोर कारवाई करावी पण निरपराधांना विनाकारण त्रास देऊ नये अशी ग्रामस्थांतर्फे विनंती करण्यात आली.सोनगीर गावात संवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथील बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी भाजीपालाचे लॉरी लावण्यावरुन दोघात झालेला वाद व त्यातून झालेल्या दगडफेकीत प्रार्थनास्थळाचे काचा फुटल्या़ या प्रकरणी ३२ जणांसह नाव माहिती नसलेल्या सुमारे  २२ अशा ५४ संशयितांविरुध्द रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़ गेल्या आठशे वर्षाच्या दोन समाजातील एकतेच्या अभेद्य भिंतीला या घटनेमुळे तडा गेला.येथील बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी भाजीपालासह अन्य विक्रेत्यांच्या लॉरींची एवढी गर्दी असते की गावात जाण्यासाठी अन्य वाहनांना जागा रहात नाही. त्यातच प्रवासी वाहतूक करणाºया कालीपिली, बस  व अन्य वाहनांमुळे प्रवाशांना देखील उभे राहायला जागा नसते. त्यामुळे बसस्थानकावर नेहमी वाद होतात. आजही तसाच प्रकार झाला. दोन जणांमध्ये लॉरी लावण्यावरुन सायंकाळी सातला वाद झाला. दोन्ही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने त्याला धार्मिक रंग चढला. गर्दी जमली. वादात बुधा भगवान माळी व आरिफ शेख आसिफ शेख यांच्या डोक्यास मार लागला. पोलिसांनी तो वाद मिटविला. मात्र अफवेतून पुन्हा सायंकाळी साडेसातला दगडफेकीचा प्रकार झाला. रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, माजी सरपंच किशोर शुक्ल, माजी उपसरपंच कैलास वाणी, आरिफ पठाण, मुन्ना शेख, शफियोद्दीन पठाण, प्रमोद धनगर, आर. के. माळी यांच्यासह दोन्ही गटातील ग्रामस्थ उपस्थित होते. तेव्हा दोन्ही गटांनी आमची काही तक्रार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली व पोलीसांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली़ निरपराधांचा बळीदगडफेकीत काही निरपराध मुले असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, अशी विनंती आर. के. माळी, प्रमोद धनगर, साहेबराव बिरारी आदींनी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याकडे केली. तेव्हा चौकशीत निरपराध आढळल्यास कारवाई मागे घेतली जाईल, असे ज्ञानेश्वर वारे यांनी स्पष्ट केले. बहुतेक युवक पंचविशीच्या आतील असून सुशिक्षित व काही नोकरदार आहेत. जर त्यात काही निरपराध असतील तर त्या मुलांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होणार असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली़ सोनगीर पोलीस ठाण्यात एकूण ३२ जणांविरुध्द भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ३३६, ३३७, २९५, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़