शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

Vidhan Sabha 2019: चर्चा अपक्ष आणि बंडखोरांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:29 IST

राजेंद्र शर्मा ।  लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या ...

राजेंद्र शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या संपूर्ण प्रचारात अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच जास्त चर्चा आहे. या अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांमुळे आघाडी आणि युती धर्म याबाबतची चर्चाही रंगत आहे. कोण - कोणाचा उघड आणि छुपा प्रचार  करीत आहे, याचीही चर्चा जोरात आहे.  सकाळी विमानतळावर स्वागताच्यावेळेस उपस्थित शिवसेना पदाधिका:यांना उद्धव ठाकरे यांनी  भाजपचे उपस्थित नेत्यांसमोर ते मदत करतात का, असा स्पष्ट सवाल  करीत आपला रोख स्पष्ट केला होता. त्यानंतर दुपारी प्रचारसभेत सरळ या विषयाला हात घालत  त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख नेतेमंडळी व पदाधिका:यांना  युती धर्माची आठवण करुन देत, आम्ही जसे धुळे ग्रामीणमध्ये प्रामाणिकपणे मदत करतो, तशी तुम्हीसुद्धा धुळे शहरातील  शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचे सांगितले. तसेच आपण पाठीत खंजीर खुपसणा:यांची औलाद नाही, हे तुम्ही सिद्ध करा, असा टोलाही लगावला. अर्थात त्याचा किती फायदा झाला आणि किती नाही, हे तर निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर धुळे शहरासह जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांचीच चर्चा सुरु झाली आहे. शहरातील  दोन्ही अपक्ष उमेदवारांपैकी कोणाला कोण स्पष्ट तर आतून मदत करतो  आहे, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. धुळे शहरातील आघाडीचे घटक पक्षाचे उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत का, हा सुद्धा चर्चेचा मुद्दा  ठरत आहे. कारण उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनिल गोटे यांनी जेव्हा आपण काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे घटक पक्ष असल्याचे जाहीर केले. तेव्हा त्याठिकाणी आघाडीचे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी उपस्थित देखील  नव्हते. नंतर दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी स्पष्टपणे यासंदर्भात आम्हाला माहित नसल्याचे देखील सांगितले होते. परंतू नंतर अनिल गोटे  यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली. तेव्हा त्याच पदाधिका:यांनी गोटे यांचा  सत्कार केल्याचे फोटो काढले. अर्थात त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश  सरचिटणीस ईशार्द जहागिरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिका:यांना अनिल गोटे यांचा प्रचार करण्याचे सांगितले. तसेच जो करणार नाही, त्याचा अहवाल प्रदेशाकडे पाठविण्यात येऊन त्यांना   तातडीने निलंबित करण्यात येईल, असे सांगून पदाधिका:यांना तंबीसुद्धा  दिली. पण त्यांच्या पत्रकार परिषदेचा किती फायदा झाला, हे सांगणे आजतरी कठीण वाटते.दुसरीकडे साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार देखील चर्चेत आहेत. याठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी या उमेदवारांसोबत    फिरतांना दिसत नाही. सर्वच प्रमुख पदाधिकारी पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारासोबत फिरतांना आणि मते मागतांना दिसत आहे. परंतू ते पक्षाच्या अधिकृत उमेदवारासोबत किती प्रामाणिक राहतील, हे सांगणे पक्षातील पदाधिका:यांना देखील कठीण वाटते. कार्यकर्ते व पदाधिका:यांमधील नाराजी दूर करण्यासाठी भाजपतर्फे प्रय}देखील  झाले आहेत. पक्षाचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी  धुळ्यात येऊन प्रत्यक्ष बंडखोर उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा  करीत ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रय} देखील केला. तसेच पदाधिका:यांना प्रामाणिकपणे युती धर्म पाळण्याचा सल्लाही दिला होता.  परंतू त्याचा  फारसा परिणाम झाला, हे आजतरी दिसत नाही. कारण  बंडखोरी थांबल्याचे दिसत नाही. साक्री आणि शिरपुरात बंडखोरी झालीच. एकूणच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात आघाडी आणि युतीचे पदाधिकारी हे अधिकृत उमेदवारासोबत प्रचार करतांना दिसत  आहे. परंतू तरीसुद्धा जिल्ह्यात अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच चर्चा जास्त आहे. यांच्यासोबत आतून कोण - कशी मदत   करीत आहे आणि   त्याचा काय परिणाम होणार, याबाबत राजकीय वतरुळात जोरदार चर्चा  सुरु आहे. त्याचा प्रभाव हा सर्वच पक्षाच्या सभेत  नेतेमंडळी प्रामुख्याने बोलतांना दिसत आहे. एकूणच जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत  यंदा अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचीच चर्चा जास्त होतांना आजतरी दिसत आहे.