शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

डेंग्यू, मलेरियापासून दक्षता घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 22:46 IST

महापालिका : मलेरिया कर्मचारी करणार घरोघरी जनजागृती

धुळे : शहरात हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी तसेच डासांची उत्पती स्थाने नष्ट करून हिवतापाला आळा घालण्यासाठी हिवताप विभागामार्फेत घरोघरी जनजागृती केली जाणार आहे़हिवताप हा कीटकजन्य आजार असून एक गंभीर व जीवघेणा आजार आहे. तो प्लाझमोडियम या एकपेशीय परोपजीवी रोगजंतूपासून होतो. हिवतापाचे रोगजंतू मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृत व प्लीहाच्या पेशींमध्ये त्यांची वाढ होते. तेथे त्यांचे जीवनचक्र पूर्ण होण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर रोगजंतू रक्त प्रवाहात मिळून रक्तातील तांबड्या पेशींवर हल्ला करतात. या रोग जंतूंना मारण्यासाठी रुग्णाच्या शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे त्याला जोराची थंडी वाजून येते. रुग्णास मळमळल्या सारखे वाटते. काही वेळेस उलट्या होतात. डोके दुखते. नंतर घाम येवून ताप उतरतो व गाढ झोप लागते. अशी माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली़ यावेळी कर्मचाºयांना जनजागृतीबाबत माहिती देण्यात आली़यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ अनिल पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी आऱजी़ मराठे, एस़ व्ही़ कुलकर्णी, एस़ बी़ लोंढे, एस़ व्ही़ सोनवणे, सी़ एस़ बागुल, जी़ ए़ मराठे, ए़ बी़ बाविस्कर आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे