शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांना बोलविणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना संक्रमणामुळे अत्यंत भयावह व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विचारात घेऊन कोरोना ...

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना संक्रमणामुळे अत्यंत भयावह व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विचारात घेऊन कोरोना संकटावर मात करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी तसेच शनिवार-रविवारी पूर्ण कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. या संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाने शाळेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना शाळांत ५० टक्के उपस्थिती राहण्यास सुचविले आहे. मात्र शासनाने घोषित केलेल्या निर्बंधांना जाणीवपूर्वक पायदळी तुडवून काही शाळांचे मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना दररोज पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करतात. काही शाळा विद्यार्थ्यांनासुद्धा नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करीत आहेत. ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असून, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या जीवनाशी खेळणारी बाब आहे. खासकरून धुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविडने होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक शाळांत कोरोना संकटापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक व्यवस्थासुद्धा निर्माण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्याध्यापकांच्या या मनमानी त्रासामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. शासनाचे निर्बंध मोडणाऱ्या मुख्याध्यापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ताकीद संबंधिताना देणे आवश्यक व निकडीचे आहे. प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे व विद्यार्थी - शिक्षकांना शाळेत बोलावणाऱ्या संस्थांना व मुख्याध्यापकांना कायदेशीर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे.