शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कजर्माफीपूर्वी शेतीचा शाश्वत विकास - रावसाहेब दानवे

By admin | Updated: May 26, 2017 13:34 IST

मांडळ येथील शिवार यात्रेदरम्यान शेतक:यांकडून गोंधळ

ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.26- शेतक:यांना कजर्माफी हवी असून त्यांच्या भावना सरकार जाणते, त्यामुळे कजर्माफी देऊच परंतु तत्पूर्वी शेतीच्या शाश्वत विकासावर भर दिला जात असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल़े तालुक्यातील मांडळ येथे झालेल्या शेतकरी शिवार यात्रेदरम्यान शेतक:यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला़
राज्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काढलेल्या संघर्ष यात्रेला विद्यमान सरकारकडून शेतकरी शिवार यात्रेने प्रत्युत्तर दिले जात असून या शिवार यात्रेचा प्रारंभ गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लातूर येथे झाला़ याच यात्रेचा भाग म्हणून भाजपची धुळे तालुक्यातील मांडळ परिसरात एका शेतात जाहीर सभा झाली़ त्यावेळी दानवे बोलत होत़े या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, लक्ष्मण सावजी, किशोर काळकर, लखन भतवाल, मनोहर भदाणे, बापू खलाणे, प्रा़अरविंद जाधव, गोंविदराव केंद्रे, किशोर संघवी, भाऊसाहेब देसले व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होत़े 
सदर कार्यक्रमाला सुरूवात होताच काही शेतक:यांनी उभे राहून कजर्माफीची मागणी करीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त करतांना, गोंधळ घालणारे पुढारी काँग्रेसचे असून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे कजर्माफी होऊ शकत़े त्यानंतर पुन्हा गोंधळ घालत प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत असल्याचे सांगितल़े अखेर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे बोलण्यासाठी उभे राहिल़े ग्रामीण भागाची नस दानवे यांना माहित असून ज्यांचे आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीत गेले ते सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत़ परंतु असा गोंधळ घातला तर काँग्रेस-राष्ट्रवादीची एकही सभा होऊ देणार नाही, असा इशारा डॉ़ भामरे यांनी दिला़ विरोधी पक्षासह विद्यमान सरकारचे प्रगतिपुस्तक देणार असल्याचेही डॉ़ भामरे म्हणाले व ग्रामीण विकासाशी निगडीत योजनांची माहिती त्यांनी दिली़ त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी शेतक:यांना मार्गदर्शन केल़े  ते म्हणाले की, सरकारला शेतक:यांची चिंता असून कजर्माफीची मागणी पूर्ण केली जाणार आह़े परंतु पुन्हा शेतक:यांवर कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विविध योजना सरकार राबवित आह़े पूर्वीचे सरकार 50 टक्के नुकसान झाले तर दुष्काळ जाहीर करायचे पण आता 33 टक्के नुकसान झाले तरी दुष्काळ जाहीर होतो, पीक विम्यासाठी अल्प रक्कम भरावी लागते, शेतक:यांना गहू 2 रूपये किलो व तांदूळ 3 रूपये किलोने उपलब्ध करून दिला़ मागेल त्यांना वीज, शेततळे व विहीरी दिल्या़ जमिनीची पोत खराब होऊ नये यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला बंडींगची कामे केली़ युरीयाचा तुटवडा दूर झाला असून आता निम कोटेड युरीया आला आहे, त्यामुळे भेसळ करता येत नसल्याचेही दानवे म्हणाल़े सभेला शेतक:यांचा चांगला प्रतिसाद लाभला़