शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

गावात बस अडवून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:11 IST

सतत उशीरा येणा-या बसमुळे शैक्षणिक नुकसान

ठळक मुद्देसाक्री आगाराच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे हाल, शैक्षणिक नुकसानशाळेसाठी गावात आलेली बस अडवून त्रस्त विद्यार्थी, ग्रामस्थांचा ठिय्या जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलनाचा निर्धार

लोकमत आॅनलाईनजैताणे : साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात जैताणे, निजामपूरपासून ७ किमी अंतरावर असलेल्या सुमारे २ हजार लोकसंख्येच्या उभरांडी गावातील शेकडो विद्यार्र्थ्यांनी निजामपूर, जैताणे येथून लवकर निघून जाणारी बस आज दुपारपासून अडवून धरली आहे. जोपर्यंत कोणी जबाबदार अधिकारी येत नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी व्यक्त केला. उभरांडी येथून रोज शेकडो विद्यार्थी निजामपूर,जैताणे येथे शिक्षणसाठी ये जा करतात. ‘गाव तिथे एस टी बस’ असे बिरुद मिरवणाºया परिवहन महामंडळाची बस येथे अनेक निवेदने, आंदोलनांनतर सुरु झाली. मात्र ही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना पायीच जावे लागते. शाळा सुटण्याच्या वेळेआधीच बस निजामपूर, जैताणे येथून निघून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यार्तूनच शाळा सोडावी लागते अन्यथा पायीच घरी परतावे लागते. अनेक दिवस पाठपुरावा करूनही समस्या सुटत नसल्याने आज अखेर विद्यार्थी व ग्रामस्थांचा संयम सुटला. त्यांनी आज उभरांंडी येथे आलेली बस दुपारी १ वाजेपासून रोखून धरली. कोणी जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यत बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला असून अडीच तासापासून शाळा बुडवून विद्यार्थ्यांनी बसजवळच ठिय्या दिला आहे. उभरांडी येथे चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळेची सुविधा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ७ किमी अंतरावर असलेल्या जैताणे, निजामपूर येथे जावे लागते. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थही निजामपूर जैताणे येथे जातात. शेकडो विद्यार्थी ५ वि ते १२वी पर्यंत शाळेसाठी ये जा करतात. उच्च माध्यमिक विद्यालयाची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ अशी आहे. सकाळी बस उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी खाजगी वाहनाने जातात.. पाचवी ते १०वीपर्यंतची शाळा १२ पासून ५.३० पर्यंत असते. बस उभरांडी येथेच १२.३० ते १ वाजता पोहचते. परिणामी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचायचे असेल तर पायी किंवा खाजगी वाहन पकडून जावे लागते. बसची प्रतीक्षा केली  तर सुरुवातीच्या तीन-चार  तासिका बुडतात. सायंकाळी ४.३० वाजताच ही बस निजामपूर येथून उभरांडीकडे रवाना होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुटण्याच्या आतच बसकडे धाव घ्यावी लागते. नववी-दहावीत असणाºया विद्यार्थ्यांना मात्र शाळा सुटेपर्यंत थांबावे लागते. त्यांना सायंकाळी निजामपूर येथून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उभरंडी येथे पोहचावे लागते. निर्जन रस्ता, डोक्याएवढ्या मुलींना जीव मुठीत घेऊन घरी यावे लागते. पाल्य घरी परतेपर्यंत पालकांचा जिवात जीव नसतो. या सर्व पार्श्वभूमीवर पालकांनी वेळोवेळी सरपंच सावळे व जि.प.शाळेचे शिक्षक प्रकाश बच्छाव यांच्या मदतीने साक्री आगारप्रमुखाना निवेदन दिले, विनंती केली. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.आज मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला. गावात बस पोहचताच ग्रामस्थांनी ती अडवून जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत बस जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. दरम्यान बससाठी तिष्ठत बसल्याने ते शाळेत पोहचू न शकल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. साक्री आगरप्रमुख देवरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी बस उशीर होण्याचे कारण ब्रेकडाऊन असल्याचे सांगून दररोज बस वेळेवर जाते, असे स्पष्ट केले. सायंकाळच्या फेरीची वेळ बदलण्यासाठी वैयक्तिक लक्ष देऊ, असेही ते म्हणाले. दुपारी ३  वाजता आपण स्वत: उभरांडी येथे जाणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बस दुपारी ४ वाजेपर्यंत उभरांडी येथेच थांबलेली होती. या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास गावात एस.टी.बस येऊ देणार नाही व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जनआंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

  

टॅग्स :Dhuleधुळे