शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

मास्क न लावणाऱ्यांवर होईल कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:07 IST

प्रश्न: कोरोना पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कोणते प्रयत्न होत आहे. उत्त्तर : जिल्हा कोरोनामुक्त राहावा, बाधितांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी ...

प्रश्न: कोरोना पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कोणते प्रयत्न होत आहे.

उत्त्तर : जिल्हा कोरोनामुक्त राहावा, बाधितांची संख्येत वाढ होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनासह, महापालिका, आरोग्य व पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या काळात मास्कचा वापर न करणाऱ्यांना २०० रुपये दंड लागू करण्यात आला आहे. त्यासाठी मनपाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरराेज मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

प्रश्न: लग्नासाठी किती जणांना परवानगी देण्यात आली आहे.

उत्त्तर : विवाह सोहळा, अंत्यविधी व इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यात ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे, तहसीलदार व स्थानिक स्वराज्य संस्थेची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी मनपाच्या पथकाकडून मंगल कार्यालयात पाहणी केली जाणार आहे.

प्रश्न: कोरोना चाचणीसाठी काय नियोजन करण्यात आले आहे.

उत्त्तर : शहरातील भाजी मंडई, मुख्य बाजारपेठा, मोठे संस्थाचालक, दुकानदार यांची रॅपिड टेस्ट करणे, कॉन्टक्ट ट्रेसिंगची संख्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी देखील भीती न बाळगता कोरोना चाचणी स्वत:हून करून घ्यावी.

प्रश्न: सार्वजनिक ठिकाणी काय निर्बंध लावण्यात आले आहे.

उत्त्तर : काही महिन्यांपासून नागरिकांनी हाॅटेल, दुकाने, सार्वजनिक उद्याने सकाळी ५ ते सकाळी ९ यावेळेत व्यायाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठीच खुले राहतील. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई होईल.

अन्यथा गुन्हा दाखल होईल

सर्दी, फ्लू व तत्सम आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी कोविड टेस्ट केली जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गर्दी करण्यास मनाई

आग्रारोड, देवपुरातील भाजीबाजार, पारोळा रोड, कराचीवाला खुटंसह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. सध्या ही गर्दी सर्व सामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी भाजी बाजार व अन्य गर्दीच्या ठिकाणी कोरोना तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

कोरोना संपला, लस बाजारात आली म्हणून विनामास्क लावणाऱ्यांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र मास्क व सॅनिटराझरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तीन महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत मोठी वाढ झाल्याने त्याठिकाणी लाॅकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला आहे. आपले शहर लाॅकडाऊन होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.