शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तणावपूर्ण शांतता, बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:50 IST

गुड्ड्या खून प्रकरण : दोन बसेसचे नुकसान, वाहतूक मार्गात केला बदल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा मंगळवारी पहाटे खून झाल्यानंतर अद्याप त्याच्या मारेकºयांना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. परंतु दुसरीकडे या घटनेचे पडसाद चार दिवसानंतर शहरात उमटत आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ८० फुटी रोड, चाळीसगाव रोड परिसरात जमलेल्या जमावाने दोन बसेसचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी दाखविलेल्या तत्परतेने  परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसच्या दैनंदिन मार्गात बदल करण्यात आला होता. शहरातील ८० फुटी रोड आणि चाळीसगाव रोडवर दुपारी जमाव जमला होता. जमावाने आपला संताप  बसेसवर काढला. औरंगाबाद - धुळे बसवर जमावातील काही लोकांनी पेट्रोलचा जळता बोळा फेकला. त्यामुळे पुढच्या काचेला तडा गेला. परंतु प्रसंगावधान दाखवून चालकाने बस तेथून काढून नेली. त्यानंतर भुसावळ - मनमाड बसवर दगडफेक केली. त्यामुळे बसच्या खिडकीची काच फुटली. दोन बसची तोडफोड झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. जमाव वाढतच असताना त्या ठिकाणी तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे पथक पोहचले.पोलिसांची मध्यस्थी घटनास्थळी दाखल झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, धुळे शहर पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे, आझादनगर पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सुरुवातीला  जमावातील काही लोकांशी संवाद साधला. जमावाला शांततेचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली. चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल चौक, तिरंगा चौक आणि पुढे शिवाजी पुतळ्यापर्यंत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. सायंकाळनंतर अफवाही पसरत होत्या. त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त लावला असून पेट्रोलिंगही सुरू केली आहे. आरोपींकडे मोबाइल नसल्याने लोकेशन मिळणे झाले कठीणसंशयित आरोपींच्या शोधासाठी तातडीने विशेष पथके तयार करण्यात आली आहे. या पथकांकडून तपासणी सुरू आहे.सर्व पथके जिल्ह्याबाहेर गेली आहेत़ त्यातील काही पथके परत माघारी आल्यानंतर पुन्हा नव्याने पथक स्थापन करून त्यांना नाशिक, पुणे, जळगाव अशा ठिकाणी पाठविण्यात आले असले तरी घटनेनंतर फरार होताना संशयितांनी एकाकडेही मोबाइल ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांचे लोकेशन मिळत नसल्याने पोलिसांना शोध मोहिमेत अडचणी येत आहे. याशिवाय हे सर्व संशयित घटनेनंतर विखुरले आहे. ते सर्व एका ठिकाणी नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होत आहे. आता त्यांच्या संपर्कातील नागरिक, नातेवाईक यांच्याकडेही विचारपूस केली जात असून लवकरच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी सांगितले.हा खून पूर्वनियोजित कट रचून करण्यात आला आहे. कारण घटनेनंतर संशयित हे ज्या वेगाने तेथून वेगवेगळया दिशेने फरार झाले आहे, त्यावरून त्यांनी हा हत्येचा कट आधीच रचलेला होता, असा संशय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला. त्यांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजमधून काही क्ल्यू मिळतो का, याचा तपास केला जात आहे.