शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

शहरात तणावपूर्ण शांतता, बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:50 IST

गुड्ड्या खून प्रकरण : दोन बसेसचे नुकसान, वाहतूक मार्गात केला बदल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा मंगळवारी पहाटे खून झाल्यानंतर अद्याप त्याच्या मारेकºयांना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. परंतु दुसरीकडे या घटनेचे पडसाद चार दिवसानंतर शहरात उमटत आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ८० फुटी रोड, चाळीसगाव रोड परिसरात जमलेल्या जमावाने दोन बसेसचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी दाखविलेल्या तत्परतेने  परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसच्या दैनंदिन मार्गात बदल करण्यात आला होता. शहरातील ८० फुटी रोड आणि चाळीसगाव रोडवर दुपारी जमाव जमला होता. जमावाने आपला संताप  बसेसवर काढला. औरंगाबाद - धुळे बसवर जमावातील काही लोकांनी पेट्रोलचा जळता बोळा फेकला. त्यामुळे पुढच्या काचेला तडा गेला. परंतु प्रसंगावधान दाखवून चालकाने बस तेथून काढून नेली. त्यानंतर भुसावळ - मनमाड बसवर दगडफेक केली. त्यामुळे बसच्या खिडकीची काच फुटली. दोन बसची तोडफोड झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. जमाव वाढतच असताना त्या ठिकाणी तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे पथक पोहचले.पोलिसांची मध्यस्थी घटनास्थळी दाखल झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, धुळे शहर पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे, आझादनगर पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सुरुवातीला  जमावातील काही लोकांशी संवाद साधला. जमावाला शांततेचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली. चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल चौक, तिरंगा चौक आणि पुढे शिवाजी पुतळ्यापर्यंत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. सायंकाळनंतर अफवाही पसरत होत्या. त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त लावला असून पेट्रोलिंगही सुरू केली आहे. आरोपींकडे मोबाइल नसल्याने लोकेशन मिळणे झाले कठीणसंशयित आरोपींच्या शोधासाठी तातडीने विशेष पथके तयार करण्यात आली आहे. या पथकांकडून तपासणी सुरू आहे.सर्व पथके जिल्ह्याबाहेर गेली आहेत़ त्यातील काही पथके परत माघारी आल्यानंतर पुन्हा नव्याने पथक स्थापन करून त्यांना नाशिक, पुणे, जळगाव अशा ठिकाणी पाठविण्यात आले असले तरी घटनेनंतर फरार होताना संशयितांनी एकाकडेही मोबाइल ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांचे लोकेशन मिळत नसल्याने पोलिसांना शोध मोहिमेत अडचणी येत आहे. याशिवाय हे सर्व संशयित घटनेनंतर विखुरले आहे. ते सर्व एका ठिकाणी नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होत आहे. आता त्यांच्या संपर्कातील नागरिक, नातेवाईक यांच्याकडेही विचारपूस केली जात असून लवकरच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी सांगितले.हा खून पूर्वनियोजित कट रचून करण्यात आला आहे. कारण घटनेनंतर संशयित हे ज्या वेगाने तेथून वेगवेगळया दिशेने फरार झाले आहे, त्यावरून त्यांनी हा हत्येचा कट आधीच रचलेला होता, असा संशय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला. त्यांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजमधून काही क्ल्यू मिळतो का, याचा तपास केला जात आहे.