शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

एकाच ठिकाणी सहा वेळेला गळती

By admin | Updated: February 3, 2015 17:23 IST

तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील ६0 टक्के भागाला तापी योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी तापी पाणीपुरवठा योजनेच्या सुकवद रॉ वॉटर पंपिंग स्टेशनजवळ तावखेडा फाट्याजवळील शेतातील मुख्य जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणावर गळती लागली. जीवन प्राधिकरणाकडे ही योजना असताना याच ठिकाणी तीन वेळा, तर मनपाकडे हस्तांतरित झाल्यानंतरही पुन्हा तीन वेळा गळती लागली. त्यामुळे रविवारी लागलेल्या गळतीमुळे साडेचार ते पाच फुटांचा संपूर्ण पाईपच बदलविण्यात आला. यासाठी एक लाख ८७ हजार रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागला आहे. सकाळी साडेनऊ वाजेपासून गळतीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. १५ लाख लीटर पाणी वायागळतीतून सुमारे १५ लाख लीटर रॉ वॉटरची नासाडी झाली. ही गळती सुकवद पंपिंग स्टेशनपासून जवळच असल्याने त्वरित पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे अधिक पाणी नासाडीचा धोका टाळता आला. पाणीपुरवठा प्रभावतीदेवपूर भागातील एम.बी.आर. जलकुंभ, नवरंगजलकुंभ, नेहरूनगर जलकुंभ तसेच बडगुजर जलकुंभ, मायक्रोवेव्ह जलकुंभ, बडगुजर जलकुंभ, मालेगाव रोडवरील पंपिंग स्टेशन, दसेरा मैदान जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ, मोहाडी उपनगर जलकुंभावरून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.२५ गळत्या काढल्यागेल्या वर्षी पाणीपुरवठा विभागाने या २५ वर गळत्या काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अद्यापही या जलवाहिनीवर दोन ठिकाणी मोठय़ा गळ्त्या आहेत. त्यात सोनगीरजवळील टोलनाका व ढंढाणे फाट्याजवळील गळतीचा समावेश आहे.

------

धुळे शहरातील ६0 टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९८९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने तापी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी सुखवद येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. तेथून मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी एमबीआर जलकुंभापर्यंत आणली आहे. एक हजार मि.मी.ची ही जलवाहिनी आहे. ती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे तिला बदलण्याची गरज आहे. परंतु यासाठी २५ कोटींवर खर्च अपेक्षितआहे. त्यामुळे महापालिकेला सद्य:स्थितीत ती जलवाहिनी बदलणे शक्य नाही.