शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच ठिकाणी सहा वेळेला गळती

By admin | Updated: February 3, 2015 17:23 IST

तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील ६0 टक्के भागाला तापी योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी तापी पाणीपुरवठा योजनेच्या सुकवद रॉ वॉटर पंपिंग स्टेशनजवळ तावखेडा फाट्याजवळील शेतातील मुख्य जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणावर गळती लागली. जीवन प्राधिकरणाकडे ही योजना असताना याच ठिकाणी तीन वेळा, तर मनपाकडे हस्तांतरित झाल्यानंतरही पुन्हा तीन वेळा गळती लागली. त्यामुळे रविवारी लागलेल्या गळतीमुळे साडेचार ते पाच फुटांचा संपूर्ण पाईपच बदलविण्यात आला. यासाठी एक लाख ८७ हजार रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागला आहे. सकाळी साडेनऊ वाजेपासून गळतीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. १५ लाख लीटर पाणी वायागळतीतून सुमारे १५ लाख लीटर रॉ वॉटरची नासाडी झाली. ही गळती सुकवद पंपिंग स्टेशनपासून जवळच असल्याने त्वरित पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे अधिक पाणी नासाडीचा धोका टाळता आला. पाणीपुरवठा प्रभावतीदेवपूर भागातील एम.बी.आर. जलकुंभ, नवरंगजलकुंभ, नेहरूनगर जलकुंभ तसेच बडगुजर जलकुंभ, मायक्रोवेव्ह जलकुंभ, बडगुजर जलकुंभ, मालेगाव रोडवरील पंपिंग स्टेशन, दसेरा मैदान जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ, मोहाडी उपनगर जलकुंभावरून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.२५ गळत्या काढल्यागेल्या वर्षी पाणीपुरवठा विभागाने या २५ वर गळत्या काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अद्यापही या जलवाहिनीवर दोन ठिकाणी मोठय़ा गळ्त्या आहेत. त्यात सोनगीरजवळील टोलनाका व ढंढाणे फाट्याजवळील गळतीचा समावेश आहे.

------

धुळे शहरातील ६0 टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९८९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने तापी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी सुखवद येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. तेथून मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी एमबीआर जलकुंभापर्यंत आणली आहे. एक हजार मि.मी.ची ही जलवाहिनी आहे. ती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे तिला बदलण्याची गरज आहे. परंतु यासाठी २५ कोटींवर खर्च अपेक्षितआहे. त्यामुळे महापालिकेला सद्य:स्थितीत ती जलवाहिनी बदलणे शक्य नाही.