शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यात ‘युरिया’चा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:42 IST

राम भदाणे : शेतकऱ्यांना दिला जातोय फुकटचा सल्ला

धुळे : धुळे तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण होऊ पहात आहे़ त्याअनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर खते उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी केली आहे़ दरम्यान, काही कृषी सेवा केंद्राकडून शेतकºयांना पर्यायी खतांचा फुकटचा सल्ला दिला जात असल्याचा आरोपही भदाणे यांनी केला आहे़धुळे तालुक्यासह जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. खरीप हंगामातील सर्वच पिकांची पेरणी झाली असुन पिके जोमाने शेतात डोलत आहे. पिकांना युरिया खताची मात्रा देण्याची गरज असताना मात्र धुळे तालुक्यातील कृषी केंद्रासह शहरातीत कृषी केंद्रांमध्ये युरीया खताचा साठा संपला आहे असे सांगण्यात येत आहे़ ऐन वेळेवर युरिया मिळत नसल्याने शेतकºयांना पर्यायी खतांचा फुकटचा सल्ला कृषी सेवा केंद्र संचालकांकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे जे खत आहेत त्याचा देखिल साठा संपण्याचा धाक दाखवत आहे. युरीयाची १ बॅग घेण्यासाठी इतर खतांच्या ६ बॅगा घ्यावा लागत आहेत. तरी देखील युरिया चढ्यादराने मिळत असल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रामदादा भदाणे यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाकडे युरिया खत तात्काळ उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी केली आहे व चढ्यादराने खत विकणाºया कृषी केंद्रावर व खत असून न देणाºयांवर कडक कारवाईची मागणी भदाणे यांनी केली आहे.खरीप हंगामातील कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला या पिकांचा हंगाम सुरू आहे. पावसाचे प्रमाण साधारण असले तरी सर्व पिके वाढीला लागली आहेत. पिकांच्या योग्य वाढीसाठी त्यांना खतं देण आवश्यक आहे. कपाशीला खताची पहिली मात्रा मिळाली असुन दुसºया मात्रेत खत देण्यासाठी खतांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, अशातच धुळे तालुक्यासह कृषी केंद्रात युरिया खतांचा साठाच संपल्याने आता वेळेवर शेतकºयांची धावपळ होत आहे. युरीया नसल्याचे सांगून अन्य खत फॉस्परस, मॅग्नेशीयम, पोटॅश, डी.ए.पी. बरोबरच अन्य खत घेण्याचा सल्ला कृषी केंद्र संचालक देत आहेत़ ६ बॅगांमागे १ युरीयाची बॅग ती पण चढ्यादराने देत आहे. अशी खंत शेतकºयांनी बोलवून दाखवली आहे. तसेच शेतकºयांना कृषी केंद्र संचालक इतर खते देखिल संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती घालुन खते विक्री करत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे व भरारी पथके नेमून संबंधीतांनावर कारवाई करावी, अशी मागणी भदाणे केली आहे.शेतकºयांपुढे समस्याचप्रत्येक वर्र्षी हंगामाच्या सुरवातीला मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध असतो. परंतु जेंव्हा पिकांना आवश्यकता भासते त्याचेळेस दुकानातील युरिया संपल्याचे नेहमीचेच झाले आहे. कोरोनाच्या काळात कृषी साहित्याबरोबर बी-बियाणे, खतं अणि मजुरांची मजुरी वाढली आहे. त्यात आता खतांचा पुन्हा तुटवडा निर्माण केला जात असल्याने शेतकºयांंनी काय करावे? असा मोठा प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे