शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

एसटीचा श्रावणात शिमगा, कर्मचाऱ्यांचे पगार लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST

धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटीची सेवा सुरळीत होऊ लागली. मात्र उत्पन्नाअभावी कर्मचाऱ्यांचे पगार रखडू लागले आहेत. ऑगस्टचे तीन ...

धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटीची सेवा सुरळीत होऊ लागली. मात्र उत्पन्नाअभावी कर्मचाऱ्यांचे पगार रखडू लागले आहेत. ऑगस्टचे तीन आठवडे झाले तरी, कर्मचाऱ्यांना अद्याप जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक चणचण भासू लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

श्रावण महिन्यातच अनेक सण येत असतात. या सणांच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. श्रावण महिना असल्याने पगार वेळेवर होतील, अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र जुलै महिन्याचा पगार मिळणेही अवघड बनले आहे. पगारच नसल्याने उसनवारीने कर्मचाऱ्यांना पैसे घ्यावे लागत आहेत. कोरोनामुळे अजूनही प्रवासी प्रवास करण्याचे टाळत आहेत. त्याचा परिणाम उत्पन्नावर झालेला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याची कारणे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.

प्रशासनाच्या नियोजनाअभावी जुलै महिन्याचा पगार रखडला आहे. पगार नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च, किराणा तसेच दैनंदिन गरजा भागविणे कठीण बनले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार नियमित झाला पाहिजे.

- दीपक पांडव,

कर्मचारी

पगारावरच महिन्याचे सर्व नियोजन अवलंबून असते. मात्र पगारच वेळेवर होत नसल्याने, आर्थिक नियोजन कोलमडते. ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी जुलैचा पगार झालेला नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविताना कसरत करावी लागते.

- प्रमिला दीक्षित

कर्मचारी

उत्पन्न कमी, खर्च जास्त

कोरोना महामारीनंतर एसटीची सेवा सुरळीत सुरू झालेली असली तरी, पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी अजूनही येत नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्नावर हाेतो.

पावसाळी हंगाम हा कमी गर्दीचा असतो. यात शेड्युल कमी केले जातात. मात्र कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जादा शेड्युल सुरू केले आहेत. अनेक गाड्या रिकाम्या धावतात. त्यामुळे जे उत्पन्न मिळते, ते डिझेलवरच खर्च होते. त्यामुळे महामंडळानेही शेड्युलचे योग्यपद्धतीने नियोजन केले पाहिजे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ ठेवून कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी प्रयत्न करावेत.

गर्दीच्या मार्गावरच बसेस सोडाव्यात

एसटी महामंडळातर्फे एकाच मार्गावर एकापाठोपाठ अनेक गाड्या सोडण्यात येत असतात. त्यामुळे एका गाडीत आठ-दहा प्रवासी, दुसऱ्या गाडीत तेवढेच प्रवासी असतात. त्यामुळे दोन्ही गाड्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. गाड्या रिकाम्या धावतात. मात्र डिझेल तेवढेच लागते. त्यामुळे एक बस पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच दुसरी बस सोडल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच गर्दीच्या मार्गावरच सर्वाधिक बसेस सोडण्याची गरज आहे.