शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

ग्रामविकास फेलोशिपसाठी दोघांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 21:56 IST

संडे अँकर । महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य व कृषी विषयावर करणार काम

धुळे : बोरकुंड ता़ धुळे येथील ईंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरकुंड व रतनपुरा गटातील २१ गावांमध्ये महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य व कृषी या विषयांवर काम करण्यासाठी व शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ईंदूबाई भदाणे प्रतिष्ठान ग्रामविकास फेलोशिप देण्यात आली.ग्रामीण भागात सक्षमीकरणाचे काम करण्यासाठी गोविंदा साळुंखे व राजश्री पाटील यांची र्इंदुबाई भदाणे प्रतिष्ठाणच्या फेलोशिपसाठी निवड झाली आहे़ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रांताधिकारी भिमराज दराडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले़ईंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व सचिव शालीनी भदाणे यांच्यासह तज्ज्ञ मार्गदर्शकांनी फेलोशिप उपक्रमासाठी योगदान दिले. यावेळी फेलोशिप समन्वयक संदीप देवरे उपस्थित होते.फेलोशिपसाठी निवड झालेले हे दोन्ही अभ्यासक ग्रामीण भागातील विविध प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करुन या समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण जनता आणि प्रशासनात दुवा निर्माण करणार आहेत़ अभ्यासाअंती काही उपाययोजना देखील सुचविणार आहेत़ शासनाच्या विविध योजनांची जनजागृती केल्यामुळे या योजनांचा लाभ घेणे ग्रामस्थांना सोपे जाणार आहे़प्रशासनाने केले कार्याचे कौतुकयावेळी प्रांताधिकारी म्हणाले, ईंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरकुंड गावात अनेक विकास कामे झालेली आहेत़ संपुर्ण परिसरात अशा प्रकारची विकासकामे करण्यासाठी, ग्रामीण समस्यांचा अभ्यास करण्यासाठी देण्यात येणाऱ्या ग्रामविकास फेलोशिपचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील प्रश्न व समस्यांना नीट समजुन घेतले आणि अभ्यासपुर्ण माहीती गोळा केली तर गावांमध्ये विकासकामे करणे सोपे जाते.अजुनही आहेत अनेक समस्याशासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचत नसल्याने किंवा ग्रामस्थांना योजनांची माहिती मिळत नसल्याने ग्रामीण भागामध्ये अजुनही अनेक समस्या आहेत़ काही स्वयंसेवी संस्था त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत़ या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात जनजागृती होत आहे़ शासनाच्या योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत़ त्यातून विकास होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे