शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बियाणे, खतांच्या काळाबाजार कृषी विभागाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

धुळे : बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, ...

धुळे : बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, पाच तंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती या कक्षात केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

खरीप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर वेगवेगळ्या अडचणी आल्याचे निदर्शनास आले आहे. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे.

कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे वाहतूक, वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत कृषी निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षात दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधता येणार आहे. संपर्क साधण्यासाठी कृषी विभागाने फोन नंबर व अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांकदेखील जारी केले आहेत.

नियंत्रण कक्षात नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली तर त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सेवा व शर्तीच्या नियमानुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.