शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

बियाणांची फी, राॅयल्टीबाबत होणार विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:53 IST

धुळे : बिजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून २५ हजार रुपये फी आणि ३ टक्के राॅयल्टी घेण्याचा एकतर्फी निर्णय कृषी ...

धुळे : बिजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून २५ हजार रुपये फी आणि ३ टक्के राॅयल्टी घेण्याचा एकतर्फी निर्णय कृषी विद्यापीठांनी घेतला असून याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबत २ डिसेंबरला मंत्रालयात बैठक होत असून धुळे जिल्ह्यातील शेतकरी बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कृषी भूषण ॲड. प्रकाश पाटील यांनी दिली.बियाणे उत्पादक कंपन्यांना प्रमाणित बियाणे तयार करतांना कृषी विद्यापीठातुन मुलभुत बियाणे घ्यावे लागते. याच्या किंमती सर्वसाधारण सामान्य शेतमालाच्या तिप्पट राहतात. मुलभुत बियाणे घेतल्यानंतर शासनाच्या विविध प्रकारच्या फी भरुन जिल्हा बिज प्रमाणिकरण यंत्रेणेच्या नियंत्रणाखाली प्रमाणित बियाणे तयार केले जाते. देशात मुलभुत बियाणेच्या किंमती ठरवायचे अधिकार फक्त भारत सरकारच्या कृषी विभागाच्या ईसारला आहेत. परंतु फक्त महाराष्ट्रातच कृषी विद्यापीठांनी स्वत:च्या अधिकारात मुलभुत बियाणेच्या किंमती व्यतिरिक्त बिजोत्पादन करणार्या शेतकरी उत्पादक कंपनीकडुन २५ हजार रुपये फी व ३ टक्के राॅयल्टी आकारण्याचा निर्णय एकतर्फी घेतला. वाशिम, अकोला, बीड, हिंगोली, औरंगाबाद, अहमदनगर, बुलढाणा जिल्ह्यातील बिजोत्पादन करणार्या शेतकरी उत्पादक कंपनी पदाधिकारी यांना एकत्र करून कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. त्यानुसार त्यांनी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. बैठकित त्यांच्या सोबत शेतकरी प्रतिनिधी म्हणुन कृषी भूषण ॲड. प्रकाश पाटील धुळे, विलास गायकवाड वाशिम, अनंता पाटील हिंगोली, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (मुळ रहिवासी कापडणे, ता. धुळे), कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त कृषी धिरज कुमार, चारही कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, बियाणे अधिकारी यांना मंत्रालयात बैठकीसाठी २ डिसेंबर रोजी बोलाविण्यात आले आहे. याबाबतीत बैठकीत सकारात्मक निर्णय होणे अपेक्षीत आहे.शेतकरी वर्गाला फटकाशासनाकडुन बियाणे संशोधन करणेसाठी संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या नावाने घ्यावयाचा व संशोधन करुन त्यावर आणखी फी व राॅयल्टी आकारावी, हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे बियाणेच्या किंमती वाढुन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढेल व यामुळे ट्रुथफुल बियाणे जे कमी दर्जाचे आहे, त्याची विक्री वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे कमी उत्पादन होऊन आर्थिक नुकसान होईल.

टॅग्स :Dhuleधुळे