शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

१९३० मध्ये झाला पहिला जंगल सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:50 IST

दिवाळ्यामाळ परिसर

हर्षद गांधी । निजामपूर : धुळे जिल्ह्यात  पहिला ऐतिहासिक जंगल सत्याग्रह साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर दिवाळ्यामाळ  येथे १७ आॅगस्ट १९३० रोजी झाला. फार मोठ्या संख्येत झालेला जनसहभाग ब्रिटिशांना विचार करावयास लावणारा ठरला. या जंगल सत्याग्रहा पाठोपाठ धुळे जिल्ह्यात लळींग, जयनगर,  डांगुणे, कुडावद, धमनार, फत्तेपूर, आमोदे आदी ठिकाणी जंगल सत्याग्रहासाठीप्रेरणा मिळाली. त्या अनोख्या पर्वास ८९ वर्षे लोटलीत.  दरवर्षी आॅगस्ट महिना येताच त्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या होतात.     पंडित नेहरुंच्या अध्यक्षतेखाली १९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात सत्याग्रह व असहकाराचे युद्ध करण्याचे ठरले. त्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधी व काँग्रेस कमेटीला देण्यात आले.  जंगल सत्याग्रह प्रचार कार्यात गुंतलेल्या काही कार्यकर्त्यांना अटक व शिक्षा झाली.  धुळे जिल्ह्यात पहिला सामुदायिक जंगल सत्याग्रह १७ आॅगस्ट १९३० रोजी साक्री तालुक्यातील दिवाळ्यामाळ येथे ठरला. निजामपूर, खुडाणे, डोमकाणी रस्त्याच्या दक्षिणेस २ कि.मी.अंतरावर घटबारीच्या  माथ्यावर विस्तीर्ण पठारावर दिवाळ्यामाळचे बंदिस्त व राखीव जंगल होते. तेथील गवत कापून कायद्याचा भंग करण्याचे ठरले. तो दिवस गोकूळ अष्टमीचा होता. आत्माराम पुंडलिक कुलकर्णी, मा. चि. देवरे, यशवंत सखाराम देसले यांच्या नेतृत्वाखालीमालपूर, कासारे, धाडणे, छडवेल पखरूण,सामोडे, पिंपळनेर, निजामपूर, जैताणे, साक्री, डोमकाणी, खुडाणे, छडवेल-कोर्ड या गावांमधून २५ हजारावर सत्याग्रही, शेतकरी, महिला, मुले या आंदोलनात सहभागी झाली होती.पोलिसांची कडी तोडून आंदोलकांनी आत घुसून जंगलातील गवत कापून कायदे भंग केला होता.

टॅग्स :Dhuleधुळे