शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बुराई नदीत वाळू तस्करांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:06 IST

महसूल विभागाचे दुर्लक्ष : दोन महिन्यात लाखो ब्रास वाळूची चोरी; उपसामुळे नदीत मोठमोठे खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : बुुुराई नदीत चिमठाणे ते परसामळपर्यंत अवैध वाळू उपसा करणाºयांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. गावकºयांनी महसूल अधिका-यांना सांगूनही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नदीतून गेल्या दोन महिन्यात लाखो ब्रास वाळू चोरी झाली असून त्यामुळे नदीत मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तहसीलदार फक्त एकटेच प्रयत्नशील दिसतात. मात्र संबंधित गावातील मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे साटेलोटे तर नाहीना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते राहुल रेखावार यांनी खुद्द बुराई नदीची पाहणी करावी व संबंधित कर्मचारी, अधिकाºयांकडून अवैध वाळू उपशाची रक्कम वसूल करून केटीवेअरच्या पाट्या दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच संबंधित बंधारे हे पाटबंधारे विभाग धुळे व जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागांतर्गत येतात. जर अवैध वाहतूक करणारे बंधाºयाच्या पाट्या अशाप्रकारे काढून नुकसान करत असतील तर त्यांच्यावर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही, त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.तालुक्याची जीवनदायनी म्हणून बुराई नदीकडे बघितले जाते. त्या नदीवर ६० टक्के तालुका अवलंबून आहे. सतत दुष्काळी परिस्थितीमुळे या नदीवर ठिकठिकाणी करोडो रुपये खर्चून केटीवेअर बांधण्यात आले आहेत. नुकतेच पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी यासाठी भरउन्हाळ्यात बुराई परिक्रमा केली व नदीवर नवीन ३४ बंधारे बांधले आहेत. तसेच पूर्वीचे जुने बंधारे आहेत त्यात लोखंडी फळ्या बसवल्या आहेत. नदीत चिमठाणे, निशाणे, महालपूर, दरखेडा, बाभुलदे चिरणे, कदाणे, अलाणे व परसामळ या गावातील बुराई नदीत अवैध वाळू उपसा करणाºयांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून वाहन नदीत नेण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी धरणाच्या पाट्या काढून वाहनाखाली टाकल्या जातात. त्यामुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच आतापर्यंत या दोन महिन्यात नदीची अक्षरश: चाळण करून मोठमोठी खड्डे पाडून लाखो ब्रास रेती चोरून नेत आहेत. याबाबत गावकाºयांनी पंचनामाच्या मागणीसह खुद्द जिल्हाधिकाºयांनी पाहणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर बाब महसूल कर्मचारी व अधिकारी यांच्या लक्षात आणून देखील त्यावर कारवाई झाली नसल्याने याचेच आश्चर्य नागरिकांमध्ये आहे. वास्तविक प्रत्येक गावात या भागातील तलाठी व कोतवाल हे स्थानिक असून देखील वाळू चोरटे त्यांना कसे सापडत नाहीत म्हणून चिमठाणे ते परसामळ पर्यंत स्वत: जिल्हाधिकाºयांनी पाहणी करून पंचनामा करून संबंधित त्या त्या गावातील महसूल कर्मचाºयांकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या बाबत अनेकवेळा नागरिकांनी तक्रार केली तर संबंधित कर्मचारी हे वरिष्ठ अधिकारी जर तालुक्याच्या दौºयावर येतात ती माहिती रेती वाहतूक करणाºयांना पुरवून सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करण्याचे सांगितले जात असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार यांनी कोणतेही वाहन पकडण्याच्या अगोदर सदर वाहन सोडवण्यासाठी तहसीलदारावर दबाव टाकण्यात येतो तहसीलदारांनी या संबंधितांची नावे उघड करून प्रसिद्धीस देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.वाहनासाठी बंधा-याच्या पाट्यांचा रस्ता...४शासनाने करोडो रुपये खर्चून अनेक ठिकाणी केटीवेअर बंधारे बांधले आहेत. मात्र अवैध वाळू उपसा करणाºयांनी त्यांच्या वाहनाच्या चाकाखाली बंधाºयाच्या पाट्यांनी रस्ता तयार करुन वाहतूक करीत आहेत. याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. धरणाला अनेक ठिकाणी पाट्या नाहीत. सदर पाट्या वाहनांच्या चाकाखाली ठेवल्याने खराब झाल्याने धरणात पाणी कसे साठवावे यासाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. आमचे काही होणार नाही अशा अविर्भावात अवैध वाळू उपसा करणारे बोलतात.

टॅग्स :Dhuleधुळे