शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

२५ दिवसापासून रोहित्र जळालेल्या स्थीतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:35 IST

वसमार परसरातील शेतकरी त्रस्त : रब्बी पिकांचे होतेय नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथील गेल्या २५ दिवसांपासून रोहित्र जळाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. रोहित्र बंद असल्याने रब्बीच्या पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे.म्हसदी ३३-११ केव्ही वीज उपकेंद्र्राअंतर्गत येणाऱ्या वसमार येथील लौखरा शिवारातील ८ फेब्रुवारी रोजी रोहित्र ांचवीस दिवसापासून जळाले आहे. शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. मात्र, याकडे वीज कंपनीच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष असून ‘आमची डीपी लवकर बसवा’ अशी विनवणी शेतकºयांनी वीज कंपनीकडे केली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून तत्काळ रोहित्र बसविण्याची गरज आहे.तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहेत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरिपाने शेतकºयांची घोर निराशा केली. रब्बीवर शेतकºयांची आशा असताना वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे.शेतकºयांनी एकत्र येवून रोहित्राची तजवीज करुनही ते बंदच राहिले. त्यानंतर वीज कंपनीच्या कर्मचाºयांनी पाहणी केली. रोहित्र जळालेले आहे, असे वीज कर्मचाºयांकडून सांगण्यात आले. रोहित्र सुरू करण्यासाठी सर्व शेतकºयांनी प्रथम दोन-दोन हजार रुपये बिल भरा त्यानंतर रोहित्र बदलवू, असे सांगितले. त्यानंतर उशिराने रिपोर्ट सादर केला.परिणामी लौखरा शिवारातील ५० हेक्टरवरील रब्बी पिके पाण्याअभावी संकटात आली आहेत. गहू, मका, कांदे, भुईमूग आदी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. याबाबत शेतकºयांनी म्हसदी येथील वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता योगेश खैरनार यांची भेटही घेतली. त्यांनी बघतो, कनिष्ठ अभियंत्यांना सांगतो, लवकरच रोहित्र देऊ, असे सांगितले. रोहित्र लवकर बसवून आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी केली. अन्यथा वीज कंपनीसमोर आंदोलन छेडू, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे.२५ दिवसापासून जळालेल्या रोहित्रामुळे मगन बाबूलाल महाले, मुकेश प्रभाकर पाटील, साहेबराव मुरलीधर पाटील, भटू शिवाजी हिरे, आनंदा रघुनाथ पाटील, छोटू राजाराम पाटील, महादू आत्माराम ध्यानिस या शेतकºयांचे रब्बीचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे