शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

रस्ते, गटारीच्या समस्येवरून महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

काेरोनामुळे अगोदरच भीतीचे वातावरण आहे. त्यातच थाळनेर येथे सफाई कर्मचाऱ्यांअभावी अभावी गटारी तुंबून भरलेल्या आहेत; तर ग्रामीण ...

काेरोनामुळे अगोदरच भीतीचे वातावरण आहे. त्यातच थाळनेर येथे सफाई कर्मचाऱ्यांअभावी अभावी गटारी तुंबून भरलेल्या आहेत; तर ग्रामीण रुग्णालयामागील वसाहत, पूरग्रस्त प्लॉट भागात रस्ते व गटारींची सोय नसल्याने सांडपाणी घराशेजारी, रस्त्यावर येत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे दिवस जवळ आल्याने या दुर्गंधीमुळे नागरिकांना साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थाळनेर गावात पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी मोठ्या प्रमाणात साचलेली असतात. गटारीही मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यामुळे आता थाळनेर हे घाणीचे आगार झाल्याचे दिसून येत आहे. गावातील अनेक ठिकाणी मध्यवस्तीत उकिरडे असून गटारींमध्ये सांडपाणी साचलेले असल्याने परिसरात डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनाने वेळीच या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याकडे समस्यांची तक्रार लेखी व तोंडी करूनही दखल घेतली जात नसल्याने, महिलांनी एल्गार पुकारून ग्रामविकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

गावातील तुंबलेल्या गटारींची साफसफाई व उकिरडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.