शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना कृषी समितीवर प्रतिनिधित्व द्या; शासकीय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाची मागणी

By अतुल जोशी | Updated: May 29, 2023 18:25 IST

कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघातर्फे कृषी आयुक्तालयातील संचालक दिलीप झेंडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.

अतुल जोशी, धुळे : राज्यातील जेवढ्या कृषीविषयक विविध समित्या आहेत, त्यावर राज्यातील कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व द्यावे. तसेच कृषी विभागाच्या जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय बैठकींना राज्यस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना आमंत्रित करावे, त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करून निर्णय घेणे शक्य होईल, अशी मागणी शासकीय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी संघातर्फे कृषी आयुक्तालयातील संचालक दिलीप झेंडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.

हा अधिकृत शासन निर्णय व्हायला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषीविषयक योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जातीत व याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होईल. निवेदनात पुढे म्हटले आहे की, दरवर्षी बोगस खते, रासायनिक खतांची व बियाणाची टंचाई निर्माण होते. याकरिता राज्याचे आयुक्त, सर्व संचालक यांनी अचानक धाडी टाकल्या तर यावर काही प्रमाणात सुधारणा होतील. ज्या जिल्ह्यात गैरप्रकार आढळतील तेथील संबंधितांना जबाबदार धरावयास पाहिजे. शेतकऱ्यांना बँक दरवर्षी पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात. याकरिता कृषी विभागाने जिल्हा प्रशासनामार्फत दिलेला लक्षांक कसा पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावयास पाहिजे.

राज्यातील जेवढ्या जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय कृषीविषयक विविध समित्या आहेत, त्यावर राज्यातील कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व द्यावे. यामुळे कृषीविषयक योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जातील व याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होईल. निवेदन देतेवेळी पढावद येथील कृषिभूषण ॲड. प्रकाश पाटील व राहुल पाटील हे उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे