शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अमरावती प्रकल्पाच्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 21:55 IST

पाण्याचे मोल : तीव्र टंचाई अनुभवल्याने ग्रामस्थ संवेदनशील

मालपूर : येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या वक्राकार दरवाजासह, वीज उपकरणांची, बांधावरील काटेरी झुडपे काढण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. या संदर्भात ‘लेकमत’मधून वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्याची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. प्रकल्पाच्या यंत्रांचे आॅईल, ग्रीसींग व वायरींगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.मालपूर येथील अमरावती हा गेल्या चौदा वर्षापासून पूर्णक्षमतेने भरु शकला नाही. मे-जून महिन्यात तर मृत जलसाठ्यात एकथेंब पाणी नव्हते. मात्र आता चांगला साठा झाला आहे.जलसाठा वाया जाऊ नये, वक्राकार दरवाज्यांना असलेली गळती दुरुस्त करावी, तेथील विद्युत पुरवठा अद्ययावत करुन वीज दिव्यांची सुरळीत सोय करावी, काटेरी झुडपांमुळे मातीच्या बंधाऱ्याला धोका होऊ नये अशी मालपूरकरांची रास्त अपेक्षा होती व त्यासंदर्भात ‘लोकमत’मधून ४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत अमरावती मध्यम प्रकल्पाचे प्रभारी कनिष्ठ अभियंता प्रशांत खैरनार यांनी काम सुरू झाल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रकल्पाच्या वक्राकार दरवाजांसह वीज उपकरणांची देखभाल व काटेरी झुडपे काढणे गरजेचे आहे. गतवर्षी कधी नव्हे एवढी पाणीटंचाई मालपूरकरांनी अनुभवली असून आता पाण्याचा प्रत्येक थेंब वाया जाणार नाही, यासाठी सज्ज आहेत. अमरावती मध्यम प्रकल्प प्रशासनाने सर्व प्रकारच्या गळत्या बंद करुन ग्रामस्थांच्या परवानगी शिवाय कोणत्याही पाणी उपसा करणारा वीजपंप प्रकल्पावर ठेवू देऊ नये. अन्यथा त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे