शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरमधील हिंदूचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 22:36 IST

सुनील घनवट : प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात प्रतिपादन, आज समारोप

धुळे : १९ जानेवारी १९८९ या दिवशी काश्मिरमधून लाखों हिंदूचा वंशविच्छेद करण्यात आला़ या घटनेस १९ जानेवारीला २० वर्ष पूर्ण होत आहेत़ मात्र, अजुनही तेथील विस्थापित हिंदूचे पुनर्वसन झालेले नाही़ विस्थापित हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन करावे, असे प्रतिपादन हिंदू जनजागरण समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी केले़धुळ्यातील मालेगाव रोडवर दोन दिवसीय प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनास शनिवारी प्रारंभ झाला़ त्यावेळी राज्य समन्वयक घनवट बोलत होते़ यावेळी किर्तनकार योगी दत्तनाथ महाराज, सनातन संस्थेचे सदगुरु नंदकुमार जाधव, धुळ्यातील भोलेबाबा दरबारचे परमपूज्य वाल्मिक दादा उपस्थित होते़घनवट म्हणाले, बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूचा प्रथम विचार होत नाही़ गोरक्षकांना तुरुंगवास आणि गोहत्या करणारे मोकाट, अशी स्थिती आहे़ जेएनयू, जमिया-मिलीया, अलिगढ विद्यापिठात देशविरोधी घोषणा दिल्या जात आहेत़ त्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जाते़ ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदू राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आहे़सदगुरु नंदकुमार जाधव म्हणाले, सनातनच्या प्रसार कार्याला संत आणि देवाचे आशिर्वाद आहेत़ सनातनसह अन्य हिंदुत्वासाठी संघटना वेगवेगळ्या प्रकारे हिंदुत्वाचे कार्य करीत आहेत़ कोणी धर्मप्रसार, गो-हत्या, लव्ह जिहाद वा अन्य मार्गाने धर्मकार्य करीत आहेत़ यासाठी इश्वरीय पाठबळ मिळाल्यास आपला मार्ग सुकर होणार आहे़ ज्याप्रमाणे प्रभु रामचंद्र यांना भगवान शंकराचा, पांडवांना श्री कृष्णाचा तर छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी माता, रामदास स्वामी, तुकाराम महाराज यांचे आशिर्वाद मिळाले, त्याप्रमाणे या धर्म-अधर्मच्या लढ्यात आपणही नामजप, प्रार्थना केली तर आपणासही हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक अध्यात्मिक बळ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले़योगी दत्तनाथ महाराज म्हणाले, पाश्चात्य नववर्षाचे स्वागत करणे, गुढीपाडव्याचा खोटा इतिहास सांगून हिंदूना धर्मपरंपरेपासून दूर करण्याचे षडयंत्र काही पुरोगाम्यांकडून राबविले जात आहे़ यामुळे हिंदूनी धर्मपरंपरांचा इतिहास जाणून धर्मग्रंथांचा अभ्यास करुन धर्माचरण करण्याची आवश्यकता आहे़दुपारच्या सत्रात आगामी काळात आपापल्या भागातील नियोजनाविषयी सर्वांनी गट चर्चेत सहभाग घेतला़ हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान डॉ़ जयंत आठवले यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन वैभव आफळे यांनी केले़ अधिवेशनाचा उद्देश रागेश्री देशपांडे यांनी सांगितला़ सुत्रसंचालन प्रतिक्षा कोरगावकर यांनी केले़ बहुसंख्य उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे