शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

शास्ती माफी योजनेत ५ कोटी रुपयांची वसुली; सहा हजार नागरिकांनी भरला थकीत मालमत्ता कर

By भुषण चिंचोरे | Updated: March 1, 2023 17:08 IST

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या शंभर टक्के शास्ती माफी योजनेत ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांची वसुली करण्यात आली.

धुळे :

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या शंभर टक्के शास्ती माफी योजनेत ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांची वसुली करण्यात आली. ६ हजार १४८ नागरिकांनी शास्ती माफी योजनेचा लाभ घेत थकीत मालमत्ता कराचा भरणा केला.

महानगरपालिकेने ६ फेब्रुवारीपासून शास्ती माफी योजना जाहीर केली होती. शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांचा दंड माफ करण्याचा निर्णय या योजनेत घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ६ ते १२ फेब्रुवारीपर्यंत शास्ती माफीची योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

साडेतीन कोटी रुपयांचा दंड माफ :६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत शहरातील ६ हजार १४८ नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केला. मालमत्ताधारकांनी एकूण ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांचा भरणा केला. कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना ३ कोटी ५८ लाख ५० हजार रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे.एकूण थकबाकीत ५० टक्के दंड :शहरातील मालमत्ताधारकांकडे एकूण ६६ कोटी रूपये थकबाकी आहे. त्यात तब्बल ३३ कोटी रूपये दंडाची रक्कम आहे. एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या वसुली पथकाने १८ कोटी रुपयांची वसुली केली तर फेब्रुवारी महिन्यात शास्ती माफी योजना जाहीर झाल्यानंतर ५ कोटी ७६ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.९३१ जणांनी भरली ऑनलाइन थकबाकी :महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर गर्दी होत असल्याने प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीनेही थकबाकी भरण्याची व्यवस्था केली होती. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला, केवळ ९३१ नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने थकबाकी भरली. इतरांनी मात्र प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर जात थकबाकी भरणे पसंत केले.

हद्दवाढीच्या गावांमध्ये प्रतिसाद नाही :हद्दवाढीच्या गावातील मालमत्ता कर चालू वर्षातील असल्याने त्यांना शास्तीमाफी योजनेचा लाभ देण्यात आलेला नव्हता. महानगरपालिकेने आकारलेल्या करांना हद्दवाढीच्या गावातील नागरिकांनी विरोध केला आहे. वसुली पथकाने तगादा लावला असला तरी ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.