शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

‘ई-पास’साठी कारणे दोनच, रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर करून जिल्हाबंदी केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता ...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर करून जिल्हाबंदी केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. मात्र, अंत्यसंस्कार अथवा वैद्यकीय कारण असल्यास अशांसाठी ई-पासचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाता येते. मात्र, त्यासाठी ई-पास असणे गरजेचे आहे. ई-पास नसल्यास चेकपोस्टवर तैनात असलेले पोलीस पुढील प्रवास करू देत नाहीत.

प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे ई-पासची खात्री केल्यानंतरच वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, माल वाहतूक तसेच एस.टी. महामंडळाच्या बसगाड्यांना ई-पासची आवश्यकता नाही.

ही कागदपत्रे हवी

लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल, हॉस्पिटलचे काम असेल तर त्याची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, प्रत्येकाचे आधार कार्ड ही कागदपत्रे जोडावी लागतात.

ई-पाससाठी अर्ज करताना नागरिक रुग्णालयात नातेवाइकाला पाहण्यास जाण्यासाठी, जवळचे व लांबच्या नातेवाइकांचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी, तर काही लोक कामाला जाण्याकरिता अर्ज करत आहेत. एकंदरीत हीच कारणे जास्त करून ई-पाससाठी दिली जात आहेत.

ई-पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी covid.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी.

२४ ते ४८ तासांत मिळतो ई-पास

ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते तसेच जोडलेली कागदपत्रे जर योग्य असतील, तर प्रवासाच्या तारखेपर्यंत ४८ ते २४ तास अगोदर मंजुरी दिली जाते. ई-पासची सुविधा उपलब्ध असल्याने, संचारबंदीच्या काळात प्रवास करता येतो.

तीच ती कारणे

खासगी वाहनांना जिल्हाबंदी असल्याने व जाणे आवश्यक असल्याने, बहुतांशजण रुग्णालयाचे कारण नमूद करीत आहेत. यानंतर अंत्यसंस्कारासाठी जायचे असल्याचेही नमूद केले जाते.