शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

‘ई-पास’साठी कारणे दोनच, रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर करून जिल्हाबंदी केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता ...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर करून जिल्हाबंदी केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. मात्र, अंत्यसंस्कार अथवा वैद्यकीय कारण असल्यास अशांसाठी ई-पासचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाता येते. मात्र, त्यासाठी ई-पास असणे गरजेचे आहे. ई-पास नसल्यास चेकपोस्टवर तैनात असलेले पोलीस पुढील प्रवास करू देत नाहीत.

प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे ई-पासची खात्री केल्यानंतरच वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, माल वाहतूक तसेच एस.टी. महामंडळाच्या बसगाड्यांना ई-पासची आवश्यकता नाही.

ही कागदपत्रे हवी

लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल, हॉस्पिटलचे काम असेल तर त्याची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, प्रत्येकाचे आधार कार्ड ही कागदपत्रे जोडावी लागतात.

ई-पाससाठी अर्ज करताना नागरिक रुग्णालयात नातेवाइकाला पाहण्यास जाण्यासाठी, जवळचे व लांबच्या नातेवाइकांचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी, तर काही लोक कामाला जाण्याकरिता अर्ज करत आहेत. एकंदरीत हीच कारणे जास्त करून ई-पाससाठी दिली जात आहेत.

ई-पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी covid.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी.

२४ ते ४८ तासांत मिळतो ई-पास

ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते तसेच जोडलेली कागदपत्रे जर योग्य असतील, तर प्रवासाच्या तारखेपर्यंत ४८ ते २४ तास अगोदर मंजुरी दिली जाते. ई-पासची सुविधा उपलब्ध असल्याने, संचारबंदीच्या काळात प्रवास करता येतो.

तीच ती कारणे

खासगी वाहनांना जिल्हाबंदी असल्याने व जाणे आवश्यक असल्याने, बहुतांशजण रुग्णालयाचे कारण नमूद करीत आहेत. यानंतर अंत्यसंस्कारासाठी जायचे असल्याचेही नमूद केले जाते.