शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावागावात जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणूची ...

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत

पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच तपासणी करून घेत उपचार सुरू करावेत. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या माध्यमातून जनजागृती करावी. त्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शनिवारी दुपारी ‘कोविड- १९’ संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, खासगी रुग्णालयांनी दरफलक लावले पाहिजेत. तेथे एक कर्मचारी नियुक्त करावा. अधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी करावी. जास्तीचे बिल आकारल्यास बिलांची पडताळणी करावी. रेमडेसेविर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच त्यांचा आवश्यकतेनुसार वापर करावा.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घ्यावी. याशिवाय

लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

जिल्हा रुग्णालयात जम्बाे कोविड सेंटर

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येत असून ते २४ तास सुरू राहील. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुळशीराम गावित, हिलाल माळी, श्याम सनेर यांनी आपले म्हणणे मांडले.