शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ब्रिटीशांनी सुरू केलेली पंजाब मेल झाली १११ वर्षांची...

By सचिन देव | Updated: May 31, 2023 18:29 IST

१ जून १९१२ मध्ये झाली सेवेला सुरूवात : सीएसटी स्थानकावर उद्या केक कापून वाढदिवस साजरा करणार

सचिन देव, लोकमत न्युज नेटवर्क, धुळे: 'झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊया'.., अशा प्रकारे ग. दि. माडगुळकर यांनी रेल्वे गाडीचे वर्णन केले असून, भारतातील सर्वात जुन्या ब्रिटीशांनी सुरू केलेल्या मुंबई-फिरोजपुर दरम्यान धावणाऱ्या पंजाब मेल ला आज १ जुन रोजी १११ वर्ष पूर्ण होत आहेत. १ जून १९१२ रोजी ब्रिटीशांनी ही गाडी सुरू केली होती. या सेवेला १११ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईतील सीएसटी स्थानकावर केक कापून गाडीचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतामध्ये राज्य करण्यासाठी आलेल्या ब्रिटीशांनी १ जून १९१२ मध्ये पंजाब लिमिटेड या नावाने या रेल्वे सेवेला सुरूवात केली. सुरूवातीला मुंबई तील बल्लार्ड पियर येथून थेट पाकिस्तान मधील पेशावर दरम्यान ही गाडी धावत होती. समुद्रामार्गे जहाजाने भारतात येणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना व त्यांच्या परिवाराला या गाडीने लाहौर मार्गे पाकिस्तानातील पेशावर शहरात आणले जात होते. मुंबईहुन सुटल्यानंतर ही गाडी कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ,बुरहानपुर,पुढे भोपाल मार्गे ही गाडी फिरोजपुर स्टेशनकडे रवाना होत होती. एकूण २ हजार ४९६ किलो मीटरचा प्रवास करत ही गाडी पेशावरला पोहचत होती .

स्वातंत्र्यानंतर फिरोजपुर पर्यंत सेवा..

स्वातंत्र्याच्या आधी ही गाडी मुंबईहुन सुटल्यानंतर पेशावर पर्यंत धावली. मात्र, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ही गाडी भारत-पाकिस्तान सीमा रेषेजवळील फिरोजपुर स्टेशन पर्यंतच धावत आहे. कोळशाच्या इंजिनवर चालविण्यात येणारी ही गाडी १९६४ पर्यंत कोळशावरच धावली. यानंतर काही वर्ष डिझेलचे इंजिन आणि आता इलेक्ट्रिक इंजिनवर या गाडीचा प्रवास सुरू आहे.

६ बोगींपासून सुरू झालेली गाडी, आता २४ बोगींवर..

ब्रिटीशांनी सुरूवात केलेल्या पंजाब मेल या गाडीला सुरूवातीला ६ बोगी होत्या. यातील तीन बोगी फक्त ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी होत्या, तरउर्वरित तीन बोगी डाक सेवेसाठी होत्या. मात्र, आता कालांतराने यात वाढ होऊन, या गाडीच्या बोगींची संख्या २४ २४ पर्यंत आली आहे. तसेच १९३० पर्यंत या गाडीत फक्त ब्रिटीश अधिकाऱ्यानांच बसण्याची परवानगी होती. त्यानंतर कालांतराने इतर नागरिकांना गाडीमधुन प्रवास करण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, सध्या ही गाडी मुंबईहुन दररोज सायंकाळी साडेसात वाजता पंजाबच्या दिशेने रवाना होते. सहा राज्यातुन १ हजार ९३३ किलो मीटरचा प्रवास करून तिसऱ्या दिवशी फिरोजपुर कैंट अर्थात पंजाब प्रांतात पोहचते. कोरोना काळ वगळता स्वातंत्र्यापासून आतापर्यंत या गाडीची सेवा अविरत सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

भारतातील सर्वांत जुनी असलेली पंजाब मेल आज १११ वर्षे पूर्ण करत असल्याचा अभिमान आहे. कोरोना काळ वगळता आतापर्यंत निरंतर ही सेवा सुरू आहे. यानिमित्त केक  कापून गाडीचा वाढदिवस  साजरा केला जाणार आहे. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे