शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

ब्रिटीशांनी सुरू केलेली पंजाब मेल झाली १११ वर्षांची...

By सचिन देव | Updated: May 31, 2023 18:29 IST

१ जून १९१२ मध्ये झाली सेवेला सुरूवात : सीएसटी स्थानकावर उद्या केक कापून वाढदिवस साजरा करणार

सचिन देव, लोकमत न्युज नेटवर्क, धुळे: 'झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊया'.., अशा प्रकारे ग. दि. माडगुळकर यांनी रेल्वे गाडीचे वर्णन केले असून, भारतातील सर्वात जुन्या ब्रिटीशांनी सुरू केलेल्या मुंबई-फिरोजपुर दरम्यान धावणाऱ्या पंजाब मेल ला आज १ जुन रोजी १११ वर्ष पूर्ण होत आहेत. १ जून १९१२ रोजी ब्रिटीशांनी ही गाडी सुरू केली होती. या सेवेला १११ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईतील सीएसटी स्थानकावर केक कापून गाडीचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतामध्ये राज्य करण्यासाठी आलेल्या ब्रिटीशांनी १ जून १९१२ मध्ये पंजाब लिमिटेड या नावाने या रेल्वे सेवेला सुरूवात केली. सुरूवातीला मुंबई तील बल्लार्ड पियर येथून थेट पाकिस्तान मधील पेशावर दरम्यान ही गाडी धावत होती. समुद्रामार्गे जहाजाने भारतात येणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना व त्यांच्या परिवाराला या गाडीने लाहौर मार्गे पाकिस्तानातील पेशावर शहरात आणले जात होते. मुंबईहुन सुटल्यानंतर ही गाडी कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ,बुरहानपुर,पुढे भोपाल मार्गे ही गाडी फिरोजपुर स्टेशनकडे रवाना होत होती. एकूण २ हजार ४९६ किलो मीटरचा प्रवास करत ही गाडी पेशावरला पोहचत होती .

स्वातंत्र्यानंतर फिरोजपुर पर्यंत सेवा..

स्वातंत्र्याच्या आधी ही गाडी मुंबईहुन सुटल्यानंतर पेशावर पर्यंत धावली. मात्र, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ही गाडी भारत-पाकिस्तान सीमा रेषेजवळील फिरोजपुर स्टेशन पर्यंतच धावत आहे. कोळशाच्या इंजिनवर चालविण्यात येणारी ही गाडी १९६४ पर्यंत कोळशावरच धावली. यानंतर काही वर्ष डिझेलचे इंजिन आणि आता इलेक्ट्रिक इंजिनवर या गाडीचा प्रवास सुरू आहे.

६ बोगींपासून सुरू झालेली गाडी, आता २४ बोगींवर..

ब्रिटीशांनी सुरूवात केलेल्या पंजाब मेल या गाडीला सुरूवातीला ६ बोगी होत्या. यातील तीन बोगी फक्त ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी होत्या, तरउर्वरित तीन बोगी डाक सेवेसाठी होत्या. मात्र, आता कालांतराने यात वाढ होऊन, या गाडीच्या बोगींची संख्या २४ २४ पर्यंत आली आहे. तसेच १९३० पर्यंत या गाडीत फक्त ब्रिटीश अधिकाऱ्यानांच बसण्याची परवानगी होती. त्यानंतर कालांतराने इतर नागरिकांना गाडीमधुन प्रवास करण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, सध्या ही गाडी मुंबईहुन दररोज सायंकाळी साडेसात वाजता पंजाबच्या दिशेने रवाना होते. सहा राज्यातुन १ हजार ९३३ किलो मीटरचा प्रवास करून तिसऱ्या दिवशी फिरोजपुर कैंट अर्थात पंजाब प्रांतात पोहचते. कोरोना काळ वगळता स्वातंत्र्यापासून आतापर्यंत या गाडीची सेवा अविरत सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

भारतातील सर्वांत जुनी असलेली पंजाब मेल आज १११ वर्षे पूर्ण करत असल्याचा अभिमान आहे. कोरोना काळ वगळता आतापर्यंत निरंतर ही सेवा सुरू आहे. यानिमित्त केक  कापून गाडीचा वाढदिवस  साजरा केला जाणार आहे. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे