शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

जिल्ह्यात शिक्षेचे प्रमाण पोहोचले ७२ टक्क्यांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST

दररोज शहरासह जिल्ह्यात लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. त्याची पोलीस दप्तरी नोंद देखील होत असते. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर ...

दररोज शहरासह जिल्ह्यात लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. त्याची पोलीस दप्तरी नोंद देखील होत असते. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी, आरोपी, साक्षीदार ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येत असते. त्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल होते. त्यावर कामकाज होऊन गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण वाढण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असतो, पण काहीवेळेस घटनेतील फिर्यादी अथवा साक्षीदार हे ऐनवेळी आपला जबाब फिरवून देत असल्याचे समोर येत आहे. तरी देखील आरोपीला शिक्षा लावण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असतो.

गुन्हा सिद्धचे प्रमाण वाढतेय

वेगवेगळ्या गुन्ह्यांतील नाेंद ही पोलिसांच्या दप्तरी होत असते. घटना आणि गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ते न्यायालयात सुनावणीसाठी पाठविले जात असते. साक्षीदार आणि आरोपी यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पार पाडली जात असल्यामुळे गुन्ह्याच्या सिद्धचे प्रमाण हे घटलेले नसून त्याच्या प्रमाणात तशी वाढ झालेली आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार त्याचा निकाल देखील लागलेला आहे.

अपयशाचे खापर साक्षीदारांवर

घटना कोणत्याही स्वरूपाची असली तरी घटनेची पोलीस दप्तरी नोंद झाल्यानंतर साक्षीदाराला तसे महत्त्व असते. साक्षीदाराची साक्ष ही न्यायालयात महत्त्वाची मानली जाते. त्याच्या साक्षीवरच तसा निकाल अवलंबून असल्याचे सर्वश्रुत आहे, पण साक्षीदाराने ऐनवेळी आपली साक्ष फिरविल्यास त्याचा परिणाम हा निकालावर होत असल्याने अपयशाचे खापर हे साक्षीदारांवर फोडले जात आहे.

घटना घडल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती घेतली जाते. फिर्याद नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. सर्व आवश्यक ते पुरावे गोळा करून न्यायालयात पाठविले जाते. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी पोलिसांचा प्रयत्न असतो.

- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक.