शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात शिक्षेचे प्रमाण पोहोचले ७२ टक्क्यांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST

दररोज शहरासह जिल्ह्यात लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. त्याची पोलीस दप्तरी नोंद देखील होत असते. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर ...

दररोज शहरासह जिल्ह्यात लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. त्याची पोलीस दप्तरी नोंद देखील होत असते. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी, आरोपी, साक्षीदार ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येत असते. त्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल होते. त्यावर कामकाज होऊन गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण वाढण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असतो, पण काहीवेळेस घटनेतील फिर्यादी अथवा साक्षीदार हे ऐनवेळी आपला जबाब फिरवून देत असल्याचे समोर येत आहे. तरी देखील आरोपीला शिक्षा लावण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असतो.

गुन्हा सिद्धचे प्रमाण वाढतेय

वेगवेगळ्या गुन्ह्यांतील नाेंद ही पोलिसांच्या दप्तरी होत असते. घटना आणि गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ते न्यायालयात सुनावणीसाठी पाठविले जात असते. साक्षीदार आणि आरोपी यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पार पाडली जात असल्यामुळे गुन्ह्याच्या सिद्धचे प्रमाण हे घटलेले नसून त्याच्या प्रमाणात तशी वाढ झालेली आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार त्याचा निकाल देखील लागलेला आहे.

अपयशाचे खापर साक्षीदारांवर

घटना कोणत्याही स्वरूपाची असली तरी घटनेची पोलीस दप्तरी नोंद झाल्यानंतर साक्षीदाराला तसे महत्त्व असते. साक्षीदाराची साक्ष ही न्यायालयात महत्त्वाची मानली जाते. त्याच्या साक्षीवरच तसा निकाल अवलंबून असल्याचे सर्वश्रुत आहे, पण साक्षीदाराने ऐनवेळी आपली साक्ष फिरविल्यास त्याचा परिणाम हा निकालावर होत असल्याने अपयशाचे खापर हे साक्षीदारांवर फोडले जात आहे.

घटना घडल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती घेतली जाते. फिर्याद नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. सर्व आवश्यक ते पुरावे गोळा करून न्यायालयात पाठविले जाते. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी पोलिसांचा प्रयत्न असतो.

- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक.