शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५८ तासांसाठी जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १७९ कोरोना ...

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १७९ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे.

आग्रा रोडवर शनिवारी नेहमी प्रमाणे गजबजलेला दिसून आला. येथील हातगाडी व फेरीवाले विक्रेत्यांनी पोलिसांकडून कारवाई होऊ नये, यासाठी नावालाच मास्क लावलेला दिसून आला. तर काहींनी कारवाईच होत नाही. म्हणून दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षा चालकांना प्रवासी संख्या कमी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना अनेक रिक्षांमध्ये प्रवासी संख्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले तर काही जण विनामास्क फिरतानाही दिसून आले.

महानगरात सायंकाळी साडेपाच वाजेपासून शुकशुकाट

संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने सायंकाळी ७ वाजेपासून पोलीस पथकाकडून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. सायंकाळी ७ वाजेनंतर शहरातील आग्रा रोड, फुलवाला चाैक, पारोळा रोड, पाचकंदील, बारापत्थर, माैलवीगंज अशा भागात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान फाशी पूलकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच बसस्थानक व पेट्रोल पंपावरदेखील शुकशुकाट दिसून आला. संचारबंदी लागू झाल्याने, सायंकाळपासून पोलिसांनी गस्त वाढवली होती. या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोलियम पदार्थ, दूध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे आदींच्या वाहतुकीसाठी सवलत देण्यात आली आहे.

होळी व धूलिवंदन साध्या पद्धतीने साजरा करा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू केका आहे. या कालावधीत येणारी होळी व धूलिवंदन साध्या पद्धतीने साजरा करावे, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावे तसेच गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाण, हॉटेल्स, रिसॉर्ट, सभागृहे, खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांच्या मोकळ्या जागा आदी ठिकाणी साजरी होणारी होळी, धूलिवंदन आणि शबे बारात उत्सव साजरा करण्यास मनाई आहे.

पोलिसांची राहणार लक्ष

नियमांचे पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पाेलिसांचे पथक नियुक्त केले आहे. या कालावधीत नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा व मनपा प्रशासनाकडून केले आहे.