शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

जिल्ह्यात ५८ तासांसाठी जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १७९ कोरोना ...

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १७९ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे.

आग्रा रोडवर शनिवारी नेहमी प्रमाणे गजबजलेला दिसून आला. येथील हातगाडी व फेरीवाले विक्रेत्यांनी पोलिसांकडून कारवाई होऊ नये, यासाठी नावालाच मास्क लावलेला दिसून आला. तर काहींनी कारवाईच होत नाही. म्हणून दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षा चालकांना प्रवासी संख्या कमी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना अनेक रिक्षांमध्ये प्रवासी संख्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले तर काही जण विनामास्क फिरतानाही दिसून आले.

महानगरात सायंकाळी साडेपाच वाजेपासून शुकशुकाट

संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने सायंकाळी ७ वाजेपासून पोलीस पथकाकडून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. सायंकाळी ७ वाजेनंतर शहरातील आग्रा रोड, फुलवाला चाैक, पारोळा रोड, पाचकंदील, बारापत्थर, माैलवीगंज अशा भागात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान फाशी पूलकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच बसस्थानक व पेट्रोल पंपावरदेखील शुकशुकाट दिसून आला. संचारबंदी लागू झाल्याने, सायंकाळपासून पोलिसांनी गस्त वाढवली होती. या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोलियम पदार्थ, दूध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे आदींच्या वाहतुकीसाठी सवलत देण्यात आली आहे.

होळी व धूलिवंदन साध्या पद्धतीने साजरा करा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू केका आहे. या कालावधीत येणारी होळी व धूलिवंदन साध्या पद्धतीने साजरा करावे, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावे तसेच गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाण, हॉटेल्स, रिसॉर्ट, सभागृहे, खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांच्या मोकळ्या जागा आदी ठिकाणी साजरी होणारी होळी, धूलिवंदन आणि शबे बारात उत्सव साजरा करण्यास मनाई आहे.

पोलिसांची राहणार लक्ष

नियमांचे पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पाेलिसांचे पथक नियुक्त केले आहे. या कालावधीत नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा व मनपा प्रशासनाकडून केले आहे.