जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्याची तृतीयपंथी स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून नोंदणीकृत तृतीयपंथीसाठी त्यांच्या तक्रार, समस्या तसेच विविध प्रश्न तसेच दफनविधीसाठी जागा उपलब्ध करणे, घरकूल संजय निराधार योजनेतून लाभार्थींना लाभ देणे, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड उपलब्ध करणे असे विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी समितीची स्थापन केेली आहे. या समितीच्या बैठकीत प्रामुख्याने तृतीयपंथींना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होण्यासाठी ठराव करून मनपाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार मनपाने तृतीयपंथींना शहरात एक ते दोन एकर जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी तृतीयपंथी समितीचे सदस्य तथा तृतीयपंथी गुरू पार्वती जोगी यांनी मागणी केली. यावेळी निलू जोगी, रोहिणी जगदेव, मीना भोसले, सदस्या मंदाकिनी गायकवाड, कविता अहिरे, शांताराम अहिरे आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त अजित यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत सहा दिवसात जागा उपलब्ध देेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले.
तृतीयपंथींना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करा- आयुक्तांना निवेदन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST