शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत गावे निवडीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST

धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मी समृद्ध, ...

धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेसाठी जिल्ह्यातील गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना तहसीलदारांना केल्या आहेत, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी दिली.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेत प्रत्येक तालुक्यात दहा गावांची निवड करावी, अशा सूचना नाशिक विभागाचे रोहयो उपायुक्त अर्जुन चिखले यांनी दोन महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कामांची आढावा बैठकदेखील झाली होती. रोहयो उपायुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीला रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खोतकर, पंचायत समितीचे सर्व गट विकास अधिकारी, उपवनसंरक्षक भोसले, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी कुलकर्णी यांच्यासह यंत्रणेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रोहयो कामांचा तालुकानिहाय आणि कामनिहाय आढावा घेण्यात आला. नवीन कामांना मंजुरी देणे, अपूर्ण कामे पूर्ण करणे, तपासण्या, तक्रारी, जीओ टॅगिंग आदींबाबत सूचना देऊन नियमाप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ या योजनेत प्रत्येक तालुक्यात १० गावांची निवड करून रोहयोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश यंत्रणेला दिले होते. त्यानुसार धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्रीसह सर्व तहसीलदारांना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राेहयो उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे. गावांची निवड करण्याची प्रक्रिया तालुका स्तरावर सुरू असली तरी निवड केलेल्या गावांची यादी अजून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.

‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत रोहयोच्या माध्यमातून गाय व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग उभारणे, पशुधन गटांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आदी कामे करण्यात येणार आहेत.