शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सालदारकीला पाऊण लाखाचा भाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 09:27 IST

कापडणे : अक्षय तृतीयेला ठरते शेतमजुरांचे साल, ग्रामीण भागात अजूनही परंपरा कायम

ठळक मुद्देशेतकरी व सालदारांच्या दृष्टीने आखाजी महत्त्वाचा दिवसयाच दिवशी ठरवितात शेतकरी वर्षभरासाठी सालदार यंदा सालाचा दर फुटला पाऊणलाख रूपये 

 

दीपक पाटील। लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : खान्देशात अक्षय तृतीयेचे जेवढे महत्व धार्मिक आहे. तेवढेच शेतकरी व शेतमजुरांच्या दृष्टीने वर्षभरातील हा  दिवस महत्वपूर्ण मानला जातो. याच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सालदारांची शेतकºयांकडून निवड केली जाते व तडजोडीअंती साल ठरविले जाते. अर्थात वर्षभरातील शेतमजुराच्या कामाचे वेतन ठरते.बदलत्या काळानुसार शेती व्यवसायातही आमुलाग्र बदल झाले. शेती क्षेत्रात नवनवीन सुधारणा झाली. यांत्रिकीकरण व सोयीस्कर अवजारांची निर्मिती झाल्याने कमीत कमी वेळेत, श्रमात व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. त्यामुळे पुर्वीसारखे सालदारकीला फारसे महत्व राहिले नाही. शेतकºयाच्या शेतात वर्षभर काम करणाºया सालदाराची निवड ही पद्धत काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अजूनही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पूर्वापार चालत आलेली सालदार निवडीची परंपरा ग्रामीण भागात अभावाने दिसून येतेच. कापडणे येथे सालदार निवड करण्यात आली. दर वर्षाप्रमाणे यंदाही सालदाराच्या वर्षभराच्या मजुरीत तीन ते पाच हजारांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ७० हजार रुपये सालदारकीचा दाम मिळाला होता. यंदा मात्र, एका सालदारासाठी ७५ हजाराचा दाम ठरला.  सालदार व्यवस्था हळूहळू बंद पडण्याला शेतकºयांसमोरील गंभीर प्रश्नच जबाबदार आहेत. सततचा कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, उत्पादनात घट, शेतकºयांच्या उत्पादीत मालाला किफायतशीर भावाचा अभाव, वाढती मजुरी, पाणीटंचाई, बैलजोडी व त्यांना लागणाºया चाºयांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा झालेली वाढ, विजेचा लपंडाव, महागडी बी-बीयाणे, खते, किटकनाशके यांच्या दरात सतत होणारी वाढ, कमी श्रमात कमी वेळात जास्त मजुरी मिळविण्याकडे मजुरांचा कल, हिस्से वाटणीमुळे जमिनीचे सतत लहान लहान होणारे तुकडे आदी बाबींमुळे शेतकºयांना संपूर्ण वर्षभर सालदार ठेवणे परवडत नसल्याने हळूहळू शेती व्यवस्थेतील सालदार निवड काळाच्या पडद्याआड होत आहे.

 

टॅग्स :DhuleधुळेAkshaya Tritiyaअक्षय तृतीया