शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सालदारकीला पाऊण लाखाचा भाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 09:27 IST

कापडणे : अक्षय तृतीयेला ठरते शेतमजुरांचे साल, ग्रामीण भागात अजूनही परंपरा कायम

ठळक मुद्देशेतकरी व सालदारांच्या दृष्टीने आखाजी महत्त्वाचा दिवसयाच दिवशी ठरवितात शेतकरी वर्षभरासाठी सालदार यंदा सालाचा दर फुटला पाऊणलाख रूपये 

 

दीपक पाटील। लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : खान्देशात अक्षय तृतीयेचे जेवढे महत्व धार्मिक आहे. तेवढेच शेतकरी व शेतमजुरांच्या दृष्टीने वर्षभरातील हा  दिवस महत्वपूर्ण मानला जातो. याच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सालदारांची शेतकºयांकडून निवड केली जाते व तडजोडीअंती साल ठरविले जाते. अर्थात वर्षभरातील शेतमजुराच्या कामाचे वेतन ठरते.बदलत्या काळानुसार शेती व्यवसायातही आमुलाग्र बदल झाले. शेती क्षेत्रात नवनवीन सुधारणा झाली. यांत्रिकीकरण व सोयीस्कर अवजारांची निर्मिती झाल्याने कमीत कमी वेळेत, श्रमात व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. त्यामुळे पुर्वीसारखे सालदारकीला फारसे महत्व राहिले नाही. शेतकºयाच्या शेतात वर्षभर काम करणाºया सालदाराची निवड ही पद्धत काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अजूनही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पूर्वापार चालत आलेली सालदार निवडीची परंपरा ग्रामीण भागात अभावाने दिसून येतेच. कापडणे येथे सालदार निवड करण्यात आली. दर वर्षाप्रमाणे यंदाही सालदाराच्या वर्षभराच्या मजुरीत तीन ते पाच हजारांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ७० हजार रुपये सालदारकीचा दाम मिळाला होता. यंदा मात्र, एका सालदारासाठी ७५ हजाराचा दाम ठरला.  सालदार व्यवस्था हळूहळू बंद पडण्याला शेतकºयांसमोरील गंभीर प्रश्नच जबाबदार आहेत. सततचा कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, उत्पादनात घट, शेतकºयांच्या उत्पादीत मालाला किफायतशीर भावाचा अभाव, वाढती मजुरी, पाणीटंचाई, बैलजोडी व त्यांना लागणाºया चाºयांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा झालेली वाढ, विजेचा लपंडाव, महागडी बी-बीयाणे, खते, किटकनाशके यांच्या दरात सतत होणारी वाढ, कमी श्रमात कमी वेळात जास्त मजुरी मिळविण्याकडे मजुरांचा कल, हिस्से वाटणीमुळे जमिनीचे सतत लहान लहान होणारे तुकडे आदी बाबींमुळे शेतकºयांना संपूर्ण वर्षभर सालदार ठेवणे परवडत नसल्याने हळूहळू शेती व्यवस्थेतील सालदार निवड काळाच्या पडद्याआड होत आहे.

 

टॅग्स :DhuleधुळेAkshaya Tritiyaअक्षय तृतीया