शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 22:19 IST

४७ मीलीमीटर पावसाची नोंद : धुळ्याच्या तापमानात एकाच दिवसात १३.६ अंशाने घसरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : निसर्ग चक्रीवादळामुळे धुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे़ जिल्ह्यात ४७ मीलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी ११.७५ मीलीमीटर पाऊस झाला आहे़धुळे तालुक्यात ९, साक्री २, आणि शिंदखेडा सर्वाधिक ३६ मीलीमीटर पाऊस झाला़ शिरपूर तालुक्यात पावसाची नोंद झाली नाही़ ही आकडेवारी सोमवारी रात्री झालेल्या पावसाची असून मंगळवारी दिवसभर देखील जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या़ शिरपूर तालुक्यात सोमवारी रात्री पाऊस झाला नसला तरी मंगळवारी मात्र दिवसभर तुरळक पाऊस सुरू होता़धुळे जिल्ह्याच्या दिशेने येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे धुळ्याचे नभांगण ढगाळ झाले असून पाऊसही सुरू आहे़ त्यामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे़ धुळ्याच्या तापमानात एकाच दिवसात १३.६ अंशाने घसरण झाली आहे़ सोमवारी ४१ अंशावर असलेला तापमानाचा पारा मंगळवारी २७.४ अंशापर्यंत खाली घसरला आहे़ त्यामुळे उन्हाची आणि उकाड्याची तीव्रता कमी होवून नागरिकांना दिलासा मिळाला आहे़धुळे शहरासह जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण होते़ सायंकाळी पावसाचा शिडकाव सुरू होता़ परंतु रात्री साडेअकरानंतर पावसाने अचानक जोर पकडला़ धुळे शहर आणि परिसरात दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला़ त्यानंतर रात्रभर अधून मधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या़ धुळे तालुक्यातील वडजाईसह परिसरात सलग १५ मिनिटे पाऊस सुरू होता़ शिंखेडा तालुक्यातील मालपूर येथे तुरळक हलक्या सरींना सुरूवात झाली होती़ साक्री तालुक्यातील कासारे आणि परिसरात देखील ढगाळ वातावरण कायम होते आणि तुरळक पाऊसाचा शिडकाव होत होता़ अचानक आलेल्या पावसामुळे न्याहळोद परिसरात धान्य, कांदा, चारा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली़ नेरसह परिसरातील गावांमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या़मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात वीजेचा लपंडाव कायम आहे़ सोमवारी मध्यरात्रीपासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे़ काही भागात तर रात्रभर वीजेचा लपंडाव कायम होता़ त्यामुळे नागरिक हैराण झाले होते़ दरम्यान, चार तारखेला चक्रीवादळ धुळे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे़विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्तनेर : नेरसह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. तर अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविषयी नागरिक आणि शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे वीज कंपनीविरोधात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दिवसा आणि रात्रीही वीज पुरवठा केव्हाही खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. वीज कंपनीच्या कार्यालयात फोन केल्यावर समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तो सतत केव्हाही खंडित केला जात आहे. त्यामुळे सर्वच जण त्रस्त झालेले आहेत.सोमवारी रात्री साडेअकरानंतर शहरासह जिल्ह्यात काही भांगामध्ये पाऊस सुरु झाला़ त्यानंतर धुळे शहरासह परिसरात रात्री तीन ते चार वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला़ काही भागात रात्रभर वीज नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली़मान्सूनपूर्व पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली़ गळक्या छतांवर अंथरण्यासाठी, शेतीमाल झाकण्यासाठी प्लॅस्टीकचे आवरण आणि जुने डीजीटल बॅनर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती़

टॅग्स :Dhuleधुळे