शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची आतापासूनच तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

धुळे : जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने अभियान ...

धुळे : जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने अभियान स्तरावर घरोघरी तपासणी मोहीम राबवावी. त्याबरोबरच संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी आतापासूनच सुरू करीत मूलभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करावी, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले.

धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मंगळवारी दुपारी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.

साक्री व शिरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या गावांमधील बाधित रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून अशा गावांमध्ये पोहोचावे. या पथकांना ग्रामस्तरीय समित्या सहकार्य करतील. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ‘निमा’ या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांनी सहकार्य करावे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार करणे शक्य होईल. या मोहिमेचे उपविभागीय अधिकारी सनियंत्रण करतील. धुळे व शिंदखेडा तालुक्यात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हा रुग्णालयात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल, असे धुळे शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवरे, सचिव डॉ. दीपक शेजवळ यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरळीतपणे सुरू राहावेत म्हणून आरोग्य विभागाने अवधान व नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीतील कामगारांची नियमितपणे रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, त्यांच्याकडील कामगार, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फेरीवाल्यांची नियमितपणे रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी सांगितले, चाचण्यांची संख्या वाढली असून, पॉझिटिव्हिटीचा दर कमी होत आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.