शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वैधु समाजातील लोकांच्या संसाराची होतेय दैना़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:28 IST

मालपूर परिसर : सुया, पोत, दामन, कंगवा, आरसा विकून चालविताय संसाराचा गाडा

मालपूर : शहरी भागाकडुन ग्रामीण भागात कोरोना ने विळखा घालायला सुरुवात केली आणि खेड्यापाड्यावर दिवसभर भटकंती करुन सुया, पोत, दामन, कंगवा, आरसा विकणाऱ्या वैधु समाजाच्या लोकांच्या संसाराची दैनाच झाली़ सध्या त्यांना गावात प्रवेश करणे देखील जिकिरीचे झाले आहे.या वस्तू कुठे विकाव्या व पोट कसे भरावे हा मोठा प्रश्न या वर्गाच्या लोकांना पडला आहे़ आत्मनिर्भर कसे व्हावे यासाठी सध्या संघर्ष सुरू असल्याचे चित्र ग्रामिण भागात दिसुन येत आहे. गावोगावी हिंडुन गरिबांची कटलरी डोक्यावर घेवुन फिरणारे वैधु समाजाचे जगणे कोरोना काळात मुश्किल झाले आहे. हा वर्ग दिवसभर फिरुन या वस्तू रोख स्वरूपात विकुन अन्यथा भाकरी वर देवुन आपली गुजरान करत असतात. प्रसंगी वेळ झाला तर ज्या गावात विक्रीसाठी जातात त्याच गावात दिवसभर फिरुन रात्री जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ओट्यावर मुक्काम करतात. हा दिनक्रम कोरोनाने सर्वच बदलुन टाकला. सध्या गावात प्रवेश मिळणे मुश्कील झाले आहे. कन्टेंमेन्ट झोनमुळे मर्यादा आल्यात. तर काही गावात सतत भटकंती करत असल्यामुळे कोरोनाच्या भितीमुळे आमच्याकडुन कोणी वस्तू खरेदी करत नसल्यामुळे जगणे मुश्किल झाले असल्याचे ते सांगतात़ हातावर पोट असणाºया अशा गरीबांची कटलरी डोक्यावर घेवुन फिरणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होताना दिसुन येत आहे. कोरोनाने हातावरील भाकरी देखील हिरावून नेल्यामुळे या वर्गाचे हाल होत आहेत.कोरोनामुळे आम्हाला काही गावातील सरपंच, पोलीस पाटील गावात पाय देखील ठेवू देत नाही. आता खूप हाल झाले असून काही दिवस उपाशी रहावे लागते. लहान मुलांसाठी आजुबाजूला भाकरी मागावी लागते. कधीच एवढे वाईट दिवस बघायला मिळाले नव्हते. ते आता बघत आहे.- राजेश गुरू वैधू

टॅग्स :Dhuleधुळे