शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सातबारा उताºयांच्या आधारे होणार पिकांचे पंचनामे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 22:14 IST

अक्कलपाडा वाढीव जलसाठ्याने नुकसान : साक्री तालुक्यातील शेतकºयांनी केला होता विरोध 

ठळक मुद्देनुकसान भरपाईसाठी लवकरच एकत्रित प्रस्ताव तापी पाटबंधारे महामंडळाकडे पाठविणारशेतकºयांच्या विरोधामुळे सर्वेक्षणाचेही त्रांगडे 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या पावसाळ्यात अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात वाढीव जलसाठा करण्यात आल्याने प्रकल्पास लागून असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आता सातबारा उताºयांनुसार करण्यात येत आहे. सर्व माहिती संकलित झाल्यानंतर नुकसान भरपाईबाबत एकत्रित प्रस्ताव लवकरच तापी पाटबंधारे महामंडळास सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गतवर्षी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पात प्रथमच ९० टक्के जलसाठा करण्यात आला होता. त्यामुळे हा साठा वाढत असताना प्रकल्पालगतच्या शेतांमध्ये पाणी शिरले. परिणामी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकºयांनी या नुकसानीच्या भरपाईची मागणी केली होती. परंतु पंचनामे करण्यास पोहचलेल्या कृषी सहायक, पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता व तलाठी यांना सैयदनगर, इच्छापूर येथे विरोध दर्शविल्याने पंचनामे होऊ शकले नव्हते. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेत नुकतीच या संदर्भात बैठक झाली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्याचवेळी होणे गरजेचे होते. परंतु शेतकºयांच्या विरोधामुळे त्यास उशीर झाल्याने शेतकºयांचे सातबारा उतारे मिळवून त्यावर नमूद पिकांच्या मूल्यांकनाद्वारे भरपाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कृषी व पाटबंधारे विभागाने कार्यवाही सुरू केली असून लवकरच एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. साक्री तालुक्यातील दातर्ती येथे प्रकल्पाच्या पाण्यामुळे डाळिंब पिकाचेही नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरू आहेत. पुढील आठवड्यात ते काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. वाढीव जलसाठ्यामुळे झालेल्या नुकसानीचा फटका  प्रकल्पबाधित क्षेत्रातील सुमारे २००च्या वर शेतकºयांना बसला आहे. किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले याचा अंदाज अद्याप यंत्रणेला  बांधता आलेला नाही. प्रकल्पात यापुढे वाढीव जलसाठा केला जाणार आहे. यंदा ९० टक्के साठा करण्यात आला. त्यामुळे नजीकच्या शेतांमध्ये पाणी शिरले. तसे या पुढे होऊ नये, याकरिता आवश्यक ठरलेले भूसंपादन केले जाणार आहे. त्याचेही काम लागलीच हाती घेण्यात आले होते. ते झाल्यानंतर अंतिम रेषा मारून भूसंपादनाचा अंदाज आला असता. परंतु शेतकºयांनी विरोध केल्याने ते कामही पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता हे काम मॅन्युअली पूर्ण करण्यात येत असून ते झाल्यानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव दिला जाणार आहे.