शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सातबारा उताºयांच्या आधारे होणार पिकांचे पंचनामे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 22:14 IST

अक्कलपाडा वाढीव जलसाठ्याने नुकसान : साक्री तालुक्यातील शेतकºयांनी केला होता विरोध 

ठळक मुद्देनुकसान भरपाईसाठी लवकरच एकत्रित प्रस्ताव तापी पाटबंधारे महामंडळाकडे पाठविणारशेतकºयांच्या विरोधामुळे सर्वेक्षणाचेही त्रांगडे 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या पावसाळ्यात अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात वाढीव जलसाठा करण्यात आल्याने प्रकल्पास लागून असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आता सातबारा उताºयांनुसार करण्यात येत आहे. सर्व माहिती संकलित झाल्यानंतर नुकसान भरपाईबाबत एकत्रित प्रस्ताव लवकरच तापी पाटबंधारे महामंडळास सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गतवर्षी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पात प्रथमच ९० टक्के जलसाठा करण्यात आला होता. त्यामुळे हा साठा वाढत असताना प्रकल्पालगतच्या शेतांमध्ये पाणी शिरले. परिणामी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकºयांनी या नुकसानीच्या भरपाईची मागणी केली होती. परंतु पंचनामे करण्यास पोहचलेल्या कृषी सहायक, पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता व तलाठी यांना सैयदनगर, इच्छापूर येथे विरोध दर्शविल्याने पंचनामे होऊ शकले नव्हते. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेत नुकतीच या संदर्भात बैठक झाली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्याचवेळी होणे गरजेचे होते. परंतु शेतकºयांच्या विरोधामुळे त्यास उशीर झाल्याने शेतकºयांचे सातबारा उतारे मिळवून त्यावर नमूद पिकांच्या मूल्यांकनाद्वारे भरपाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कृषी व पाटबंधारे विभागाने कार्यवाही सुरू केली असून लवकरच एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. साक्री तालुक्यातील दातर्ती येथे प्रकल्पाच्या पाण्यामुळे डाळिंब पिकाचेही नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरू आहेत. पुढील आठवड्यात ते काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. वाढीव जलसाठ्यामुळे झालेल्या नुकसानीचा फटका  प्रकल्पबाधित क्षेत्रातील सुमारे २००च्या वर शेतकºयांना बसला आहे. किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले याचा अंदाज अद्याप यंत्रणेला  बांधता आलेला नाही. प्रकल्पात यापुढे वाढीव जलसाठा केला जाणार आहे. यंदा ९० टक्के साठा करण्यात आला. त्यामुळे नजीकच्या शेतांमध्ये पाणी शिरले. तसे या पुढे होऊ नये, याकरिता आवश्यक ठरलेले भूसंपादन केले जाणार आहे. त्याचेही काम लागलीच हाती घेण्यात आले होते. ते झाल्यानंतर अंतिम रेषा मारून भूसंपादनाचा अंदाज आला असता. परंतु शेतकºयांनी विरोध केल्याने ते कामही पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता हे काम मॅन्युअली पूर्ण करण्यात येत असून ते झाल्यानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव दिला जाणार आहे.