शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

धुळ्यात ‘शिवशाही’साठी प्रवाशांना धरले जाते वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:26 IST

नाशिकसाठी बायपास साधी बस लवकर लागत नाही : प्रवाशांना ताटकळत राहावे लागते

ठळक मुद्देमहामंडळातर्फे नाशिकसाठी शिवशाही सुरूत्यासाठी परिवर्तनच्या फेºया कमी केल्याशिवशाहीचे पूर्ण सीट झाल्याशिवाय साधी बस लावत नाही

आॅनलाइन लोकमतधुळे : प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्यासाठी सुरू केलेल्या ‘शिवशाही’ बसचे अनेक प्रवाशांनी  स्वागत केले. मात्र नाशिकसाठी सुरू केलेली बायपास   ‘शिवशाही’ बसचे प्रवासी पूर्ण झाल्याशिवाय साधी (लाल) बस लागतच नसल्याने, प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्नवाढीसाठी एस.टी. महामंडळ एकप्रकारे  प्रवाशांना वेठीस धरत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.‘शिवशाही’ सोबतच ‘परिवर्तन’ ची बससेवाही सुरळीत ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.खासगी बससेवेच्या स्पर्धेला  तोंड देण्यासाठी एस.टी. महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक, वातानुकूलित  अशी  ‘शिवशाही’ बससेवा सुरू केली. मुंबई, पुण्यासाठी ही वातानुकूलित बससेवा सुरू झाल्याने, प्रवाशांनी या बससेवेचे स्वागत केले. ‘शिवशाही’मुळे खासगी बसकडे गेलेला प्रवासी पुन्हा महामंडळाच्या बसकडे आकर्षिला गेला.नाशिकसाठी सक्ती नकोया परिसरातून नाशिकला जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा नसल्याने प्रवासी बसनेच प्रवास करीत असतात. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, महामंडळाने पाच वर्षांपूर्वी मालेगाव बायपास धुळे-नाशिक बससेवा सुरू केली. सुरवातीला वाहकासह जाणाºया या बसला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. नंतर ही बस विनावाहक धावू लागली. अवघ्या तीन तासात ही बस नाशिकला जात असल्याने, तसेच गाडीत जागा मिळविण्यासाठी कटकट नसल्याने प्रवाशांचा ‘बायपास’ला चांगला प्रतिसाद मिळू लागला.  यात नाशिक व धुळे आगाराच्या प्रत्येकी २७-२७ फेºया होत होत्या. अर्ध्या-अर्ध्या तासाने नाशिकसाठी बायपास बस उपलब्ध होत होती.मात्र आता महामंडळाने या मार्गावर ‘शिवशाही’ बायपास बस सुरू केली. यासाठी साध्या बसच्या काही फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. या बसला प्रवाशांचा विरोध नाही. मात्र सक्तीला विरोध आहे.प्रवासी भाड्यात तफावतएक शिवशाही बस व एक परिवर्तन (लाल) बस असे धुळे आगाराचे नियोजन आहे. मात्र ‘शिवशाही’ व परिवर्तन बस यांच्यातील प्रवासी भाड्यात मोठी तफावत आहे. ‘शिवशाही’साठी नाशिकचे भाडे २६४ रुपये आकारण्यात येत. तेच साध्या बससाठी १७६ रुपये लागतात. म्हणजे दोन बसच्या प्रवासी भाड्यात थोडी-थोडकी नव्हे तर ८८ रुपयांची तफावत आहे. ही तफावत प्रवाशांना रूजलेली नाही.प्रवाशांना ताटकळत राहावे लागतेबायपास शिवशाही बसचे प्रवासी पूर्ण झाल्याशिवाय  दुसरी लाल बस बायपास स्थानकात लागत नाही. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. अनेकांना वेळेत नाशिकला पोहचायचे असते. मात्र साधी बायपास बस लवकर लागत नसल्याने, प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. पूर्वी अर्ध्या-अर्ध्या तासाला साधी बायपास बस लागायची. आता मात्र तास, दीडतास वाट पहावी लागते. एस.टी. महामंडळाने शिवशाही सोबतच साधी बसदेखील लावावी अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे.