शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

उत्पन्नाआधीच जळाल्या फळबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 19:14 IST

पदरी निराशा । खर्चही निघाला नाही, हवामान खात्याच्या अंदाजाचाही फटका

विजय माळी ।न्याहळोद : एकवेळ हंडाभर पिण्याचे पाणी मिळू शकेल पण फळबाग कशी वाचवायची ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. गतवर्षी लागवड केलेली फळबाग पाण्याअभावी जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उत्पन्न तर दूर पण आजपर्यंत केलेल्या खर्चाचे कर्ज डोक्यावर बसले आहे.पाऊस समाधानकारक होईल, असा अंदाज गतवर्षी हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार शेतकºयांनी फळबागेचे नियोजन केले. मात्र अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरींना पाणी आलेच नाही. आतापर्यंत इतर पिकांची लागवड न करता वर्षभर ह्या बागा जगविल्या. त्यांना बहार देखील आला पण पाण्याअभावी फळांची वाढ झाली नाही. बाजारात माल जाण्याआधी अनेक शेतकºयांच्या फळबागा पाण्याअभावी जळल्या आहेत. फळबाग लागवड पावसाळ्यापूर्वीच करावी लागते. पावसाळा चांगला होईल, या आशेने शेतकरी लाखो रुपये खर्च करून फळबाग लावतो. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करून झाडे जगवली; परंतु हवामान खात्याच्या अंदाज नुसार पाऊस न झाल्याने शेतकºयांच्या पदरी काहीच पडलेले नाही. इतर पिके कमी कालावधीची असतात. उपलब्ध पाण्यानुसार त्यांची लागवड केली जाते. परंतु फळबाग नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे लागत असल्याने ‘पाऊस पडला तर ठीक नाही तर नुकसान’ असे समीकरण असते. सलग तीन वर्षे पाऊस झालेला नाही. कृषिखाते फळबाग लागवडीस प्रोत्साहन देते तर शासन जलसंधारणाकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे बाजारात फळे कशी नेणार, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

टॅग्स :Dhuleधुळे