शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

उत्पन्नाआधीच जळाल्या फळबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 19:14 IST

पदरी निराशा । खर्चही निघाला नाही, हवामान खात्याच्या अंदाजाचाही फटका

विजय माळी ।न्याहळोद : एकवेळ हंडाभर पिण्याचे पाणी मिळू शकेल पण फळबाग कशी वाचवायची ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. गतवर्षी लागवड केलेली फळबाग पाण्याअभावी जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उत्पन्न तर दूर पण आजपर्यंत केलेल्या खर्चाचे कर्ज डोक्यावर बसले आहे.पाऊस समाधानकारक होईल, असा अंदाज गतवर्षी हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार शेतकºयांनी फळबागेचे नियोजन केले. मात्र अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरींना पाणी आलेच नाही. आतापर्यंत इतर पिकांची लागवड न करता वर्षभर ह्या बागा जगविल्या. त्यांना बहार देखील आला पण पाण्याअभावी फळांची वाढ झाली नाही. बाजारात माल जाण्याआधी अनेक शेतकºयांच्या फळबागा पाण्याअभावी जळल्या आहेत. फळबाग लागवड पावसाळ्यापूर्वीच करावी लागते. पावसाळा चांगला होईल, या आशेने शेतकरी लाखो रुपये खर्च करून फळबाग लावतो. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करून झाडे जगवली; परंतु हवामान खात्याच्या अंदाज नुसार पाऊस न झाल्याने शेतकºयांच्या पदरी काहीच पडलेले नाही. इतर पिके कमी कालावधीची असतात. उपलब्ध पाण्यानुसार त्यांची लागवड केली जाते. परंतु फळबाग नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे लागत असल्याने ‘पाऊस पडला तर ठीक नाही तर नुकसान’ असे समीकरण असते. सलग तीन वर्षे पाऊस झालेला नाही. कृषिखाते फळबाग लागवडीस प्रोत्साहन देते तर शासन जलसंधारणाकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे बाजारात फळे कशी नेणार, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

टॅग्स :Dhuleधुळे