शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २६ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक!

By admin | Updated: May 24, 2017 00:21 IST

पाटबंधारे विभागाची मनपाला नोटीस : पाण्याच्या नियोजनासह पाणीपट्टी भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाºया नकाणे तलावात केवळ २६ दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असून मनपाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे १ कोटी ८४ लाख रुपयांची पाणीपट्टी भरावी, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने मनपा प्रशासनाला बजाविली आहे़ केवळ २६ दिवसांचा साठामहापालिका क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ त्यामुळे मनपाचा पाणी वापरदेखील वाढत असून दररोज मनपाकडून अधिक पाणी उचलले जाते़, त्यावर पाटबंधारे विभागाने यापूर्वीदेखील आक्षेप घेतला आहे़ दरम्यान, मनपाच्या अधिक पाणी वापरामुळे सद्य:स्थितीत नकाणे तलावात केवळ १़४६ दलघमी (५१़५६ दलघफू) पाणीसाठा शिल्लक आहे़ मनपा  दररोज २ दलघफू पाणी वापरत असल्याने सद्य:स्थितीत केवळ २६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करून काटकसर आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाने दिलेल्या नोटिसीत नमूद आहे़तर पुन्हा पाणीटंचाईपावसाळा सुरू होण्यास काही दिवस उरले असले, तरी दरवर्षीचा अनुभव पाहता जून महिन्यात पाऊस होईलच; याची शाश्वती नसते़ त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास शहराला पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो़ काही दिवसांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्यातच आता नियोजन न झाल्यास जून महिन्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो़ थकबाकीचेही स्मरणपाटबंधारे विभागाची पाणीपट्टी न भरल्याने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस नकाणे तलावाचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने खंडित केला होता़ त्यानंतर मार्चमध्येही मनपाला सातत्याने नोटिसा बजाविण्यात आल्याने जवळपास ५० लाख रुपयांचा भरणा मनपाने यापूर्वी केला आहे़ तरीदेखील अजून १ कोटी ८४ लाख १३ हजार रुपये पाणीपट्टीची थकबाकी असून ती तत्काळ भरण्यात यावी, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे़अक्कलपाडातून पाण्याची मागणी़़़अक्कलपाडा प्रकल्पातून नकाणे तलावात पाणी सोडण्यात यावे, यासाठी मनपाकडून जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला असला, तरी त्यासाठी पाठपुरावादेखील आवश्यक आहे़ शहरात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईस जबाबदार धरून मनपा प्रशासनाने पाच अभियंत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता़ त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन तत्काळ करावे लागणार आहे़