शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

केवळ २६ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक!

By admin | Updated: May 24, 2017 00:21 IST

पाटबंधारे विभागाची मनपाला नोटीस : पाण्याच्या नियोजनासह पाणीपट्टी भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराच्या ४० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाºया नकाणे तलावात केवळ २६ दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असून मनपाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे १ कोटी ८४ लाख रुपयांची पाणीपट्टी भरावी, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने मनपा प्रशासनाला बजाविली आहे़ केवळ २६ दिवसांचा साठामहापालिका क्षेत्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ त्यामुळे मनपाचा पाणी वापरदेखील वाढत असून दररोज मनपाकडून अधिक पाणी उचलले जाते़, त्यावर पाटबंधारे विभागाने यापूर्वीदेखील आक्षेप घेतला आहे़ दरम्यान, मनपाच्या अधिक पाणी वापरामुळे सद्य:स्थितीत नकाणे तलावात केवळ १़४६ दलघमी (५१़५६ दलघफू) पाणीसाठा शिल्लक आहे़ मनपा  दररोज २ दलघफू पाणी वापरत असल्याने सद्य:स्थितीत केवळ २६ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करून काटकसर आवश्यक असल्याचे पाटबंधारे विभागाने दिलेल्या नोटिसीत नमूद आहे़तर पुन्हा पाणीटंचाईपावसाळा सुरू होण्यास काही दिवस उरले असले, तरी दरवर्षीचा अनुभव पाहता जून महिन्यात पाऊस होईलच; याची शाश्वती नसते़ त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास शहराला पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो़ काही दिवसांपूर्वी जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्यातच आता नियोजन न झाल्यास जून महिन्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो़ थकबाकीचेही स्मरणपाटबंधारे विभागाची पाणीपट्टी न भरल्याने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस नकाणे तलावाचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने खंडित केला होता़ त्यानंतर मार्चमध्येही मनपाला सातत्याने नोटिसा बजाविण्यात आल्याने जवळपास ५० लाख रुपयांचा भरणा मनपाने यापूर्वी केला आहे़ तरीदेखील अजून १ कोटी ८४ लाख १३ हजार रुपये पाणीपट्टीची थकबाकी असून ती तत्काळ भरण्यात यावी, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे़अक्कलपाडातून पाण्याची मागणी़़़अक्कलपाडा प्रकल्पातून नकाणे तलावात पाणी सोडण्यात यावे, यासाठी मनपाकडून जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला असला, तरी त्यासाठी पाठपुरावादेखील आवश्यक आहे़ शहरात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईस जबाबदार धरून मनपा प्रशासनाने पाच अभियंत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता़ त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन तत्काळ करावे लागणार आहे़