शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

टायर फुटल्याने कांद्याचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST

२ मे रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील सावळदे पुलाजवळ ही घटना घडली़ पिंपळगाव-नाशिक येथून ट्रक (आऱजे़-११- ...

२ मे रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील सावळदे पुलाजवळ ही घटना घडली़

पिंपळगाव-नाशिक येथून ट्रक (आऱजे़-११- जी़बी़- ५८९० ) मध्ये ३० टन कांदा भरून कानपूर येथे जाण्यासाठी निघाला होता़ मार्गावरील तापी नदी पूल ओलांडून ट्रक येत असताना अचानक गाडीचे दोन्ही टायर फुटल्याने चालक राजेश रावत (रा़सिप्री उत्तर प्रदेश) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सरळ पुलाचे कठडे तोडत ये-जा करणाऱ्या दोन्ही पुलांच्या मध्यभागी असलेला ८ ते १० फुटांच्या खड्ड्यात जाऊन आदळला़ त्यामुळे गाडीचे पूर्णत: नुकसान होऊन गाडीतील कांद्याच्या गोण्या इतरत्र विखरून पडल्या. अंधार असल्यामुळे जेमतेम चालक रावत व सहचालक हे दोन्ही कसेबसे बाहेर पडून रस्त्यावर आलेत़ त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार जवळील हॉटेल चालकांना सांगितला़

घटनेची माहिती वाऱ्यासारखी जवळील सावळदे येथील ग्रामस्थांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी गर्दी करून मिळेल त्या कांद्याने भरलेल्या गोण्या वाहून नेल्या.

सुदैवाने तापी नदी पूल ओलांडल्यानंतर ही घटना घडल्यामुळे मोठा अपघात टळला, अन्यथा ही ट्रकसुद्धा पाण्यात पडला असता. या अपघातात चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत़

वाहने पाण्यातच पडूऩ़़

२८ ऑगस्ट २०२० रोजी पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्यामुळे पुलाचे कठडे तोडत ट्रक पाण्यात पडला होता़ अद्यापही त्या वाहनांचा शोध लागलेला नाही़ सुरुवातीला खासगी आराम बस पाण्यात पडल्याची वार्ता पसारताच प्रशासनदेखील दचकले़ त्यामुळे प्रशासनाने तातडीने राज्य आपत्ती दलाला पाठवून शोध घेण्यास कळविले़ मात्र, त्यानंतर ते वाहन ट्रक असल्याचे कळताच त्यानंतर शोध घेण्यास त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केले़ तेव्हापासून ते वाहन अद्यापही पाण्यातच आहे़

२० जून २०२० रोजी दुपारच्या सुमारास एका ट्रकचे टायर फुटल्यामुळे सावळदे गावाजवळील तापी नदीपात्रात जाऊन बुडाला होता़ दरम्यान, दुसऱ्या दिवशी चालकाचा मृतदेह मिळून आला होता. मात्र तेव्हापासून तो तांदळाने भरलेला ट्रॅक अद्यापही पाण्यातून बाहेर काढलेला नाही़ या घटनेला आज १० महिने उलटूनही हा ट्रक यंत्रसामुग्रीअभावी बाहेर काढण्यात आलेला नाही हे विशेष़

९ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या भल्या पहाटे दोन वाहने तापी नदीपात्रात पडली; मात्र त्या दोघांना पाण्यात पोहता येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता़

२०१४ मध्येदेखील लोखंडी भंगाराचा ट्रक पाण्यात पडला होता़

१६ नोव्हेंबर २००९ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारा टीव्ही व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य घेऊन जाणारा कंटनेर पुलाचे कठडे तोडून पाण्यात पडला होता़ कंटेनर हा गाजियाबादहून औरंगाबाद येथे व्हिडिओकॉन कंपनीचे टीव्ही पिक्चर टयूब घेऊन जाण्यासाठी निघाला होता़ प्रशासनाने दोन दिवस प्रयत्न करूनही तो कंटेनर बाहेर काढण्यात आला नव्हता़ १८ नोव्हेंबर रोजी ट्रकमध्ये मामा-भाचा यांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त निश्चित झाले़ १९ रोजी पाण्यात पडलेला कंटनेर पुणे येथील सीआरपीएफ पथकासह सावळदे येथील स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला़ त्यावेळी मामा-भाचा या दोघे कॅबीनमध्येच अडकल्याचे मिळून आले होते़