शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

एका चव्हाण दाम्पत्याचा विजय तर दुसऱ्याचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST

२०१५च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मातब्बर असलेले लक्ष्मीकांत बापुराव चव्हाण-पाटील व त्यांचेच एका काळचे जीवलग साथीदार चंद्रकांत मधुकर चव्हाण-पाटील यांच्यातच लढत ...

२०१५च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मातब्बर असलेले लक्ष्मीकांत बापुराव चव्हाण-पाटील व त्यांचेच एका काळचे जीवलग साथीदार चंद्रकांत मधुकर चव्हाण-पाटील यांच्यातच लढत लागून चंद्रकांत चव्हाण यांनी सत्ता मिळवून सरपंच पदावर विराजमान झाले़ दरम्यानच्या काळात दोघांमध्ये विकोपाचे वाद निर्माण झालेत़ अखेर ते दोघे जीवलग साथीदार एकमेकांचे दुश्मन झालेत़

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते दोघे स्वत:सह सौभाग्यवतींना रिंगणात उतरून आमने-सामने पॅनल उभे केले होते़ सरपंच पदावर डोळा ठेवून दोघे पॅनल प्रमुखांसह त्यांच्या सौभाग्यवतीही रिंगणात उतरविले़ मात्र, या निवडणुकीत मातब्बर असलेले लक्ष्मीकांत पाटील यांनी सत्ताधारी गटाचा दारुण पराभव केला़ १७ पैकी १० जागा जिंकल्यात आहेत, तसेच बिनविरोध झालेले २ उमेदवारही त्यांच्या गटाला जाऊन मिळतील़

प्रभाग ३ मध्ये विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील विरोधात विरोधी गटाचे पॅनल प्रमुख लक्ष्मीकांत पाटील आमने-सामने रिंगणात होते़ मतमोजणीत चंद्रकांत पाटील यांना २३१ तर लक्ष्मीकांत पाटील यांना ४२८ मते मिळाल्याने, १९७ मताधिक्याने ते विजयी झालेत़ प्रभाग १ मध्ये सरपंचाच्या पत्नी सुनंदा चंद्रकांत चव्हाण यांचा पॅनल प्रमुख असलेले लक्ष्मीकांत पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील यांनीही ५१ मतांनी पराभव केला़ पती-पत्नी असलेले लक्ष्मीकांत हे दोघे विजयी झाले, तर सत्ताधारी गटाचे चंद्रकांत पाटील हे दोघे पती-पत्नी पराभूत झालेत़

या ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ मध्ये युवा तरुण मयूर देवेंद्र पाटील-राजपूत यांनी अपक्ष उमेदवारी करीत ९८ मताधिक्याने मातब्बरांवर मात करीत विजय मिळविला़ या प्रभागात मतांचा मोठा बाजार लागला असताना, केवळ मयूर पाटील यांनी आतापर्यंत गावातील ग्रामस्थांसाठी केलेले योगदान व कामांची जाण राखत मतदारांनी प्रस्तापितांना धक्का देत त्यांना विजयी केले़