शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख८९ हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:22 IST

खरीप हंगाम २०१९-२० : कपाशीचे बियाणे १५ मे नंतरच उपलब्ध होणार, जिल्हा बॅँकेतर्फे ३२ कोटीचे पीककर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :२०१९-२० या वर्षात जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे  उद्दिष्ट असून, त्यात २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड  करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा बॅँकेतर्फे १० एप्रिलपासून शेतकºयांना  पीक कर्ज वाटप करण्यात येत असून, आतापर्यंत ३२ कोटींचे कर्ज वाटप झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. खरीप हंगामपूर्व आढावा बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे, वनविभागाचे उपवनसंरक्षक शेंडगे होते.  कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील यांनी गुलाबी बोंड अळी व मकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या निर्मूलनासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी चारा नियोजन, कृषी पंप विद्युत पुरवठा, कृषी यांत्रिकीकरण, पंतप्रधान पीक विमा येजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनां आदींची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. गेल्यावर्षी ८६ टक्के क्षेत्रावरच पेरणी२०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामासाठी ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे  जिल्ह्यात ४ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली. त्याची टक्केवारी ८६.२९ एवढी होती. गेल्यावर्षी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने खरीपाचे उत्पादनात घट आली होती. बियाण्यांची मागणीखरीप हंगामासाठी एकूण ४० हजार ३२५ क्विंटल विविध पिकांचे तसेच १० लाख ४४ हजार कापूस बियाण्यांच्या पाकीटांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आलेली आहे. यात महाबिजकडून कापूस वगळता ४ हजार ३३ क्विंटल विविध पिकांचे बियाणे व खाजगी कंपनीमार्फत ३६ हजार २९३ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.  बीटी कपाशीचे १० लाख ३५ हजार पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी १५ मे नंतरच बीटी कापसाचे बियाणे उपलब्ध होतील. खरीपात पिकांना खते मोठ्या प्रमाणावर द्यावी लागतात. त्यामुळे जिल्हयासाठी १ लाख १३ हजार ९०० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. गेल्यावर्षाचा २९ हजार ८५२ मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक आहे. जिल्हा बॅँकेतर्फे ३२ कोटी वाटपखरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बॅँकाना खरीप हंगामाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.  त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून १० एप्रिल पासून कर्ज वाटप सुरू झाले आहे. त्यात आतापर्यंत ५ हजार ४७० शेतकºयांना ३२ कोटीचे कर्ज वाटप झाल्याची माहिती बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. रिझर्व बॅँकेच्या नियमांची माहिती देत  जिल्हा बॅँकेकडे असलेल्या ठेवीच्या तुलनेत त्यांना देण्यात आलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अधिक  असल्याचे सांगितले. जिल्हा बॅँकेला २१० कोटी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. तंत्र अधिकारी प्रियांका सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.  यावेळी विविध विभागांचे प्रमुख, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.शेतकºयांचा कापूस लागवडीकडेच कलगेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. विविध किडरोगामुळे कपाशीचे उत्पन्न कमी झाले, बाजारपेठेत कपाशीला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसला तरी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही शेतकºयांचा सर्वाधिक कल हा कापूस लागवडीकडेच आहे. जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तसेच खरीप ज्वारी २० हजार २०० हे. बाजरी ७२ हजार हे.मका ७८ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे. बाजाराधारित   आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी रेखावारधुळे जिल्ह्यासाठी कृषी हा अत्यंत महत्वाचा घटक असून कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालयाने बाजाराधारित पीक पध्दतीचे नियोजन करीत आराखडा तयार करावा. या आराखड्याची जून २०१९ पासून अंमलबजावणी करावी. जेणेकरुन अन्य शेतकºयांना प्रेरणा मिळेल, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथे केल्या.जिल्हाधिकारी  रेखावार म्हणाले, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयाने या आराखडा तयार करताना बाजारपेठेचे विश्लेषण करुन कोणत्या काळात कोणते पीक घेतल्यास शेतकºयांचा  लाभ होईल याचा विचार करावा. यामुळे जिल्ह्यातील पीक पध्दती बदलण्यास मदत होवून शेतकºयांना  चांगला मोबादला मिळेल. प्रत्येक महसूल मंडळातून किमान एक शेतकरी अशा पध्दतीने पुढे आला पाहिजे. त्यासाठी आवश्यकता भासली, तर निधी उपलब्ध करुन दिला जाईल.जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. जुलै २०१९ पर्यंत पाणी उपलब्ध असले, तरी नागरिकांनी पाण्याचा अतिशय काटकसरीने आणि जपून वापर करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Dhuleधुळे