जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वाधित ८ हजार २८२ कोरोना बाधित रुग्ण महानगरात आढळून आलेले आहेत. त्यापैकी ४ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, महानगरातील २१८ जणांना आतापर्यंत सहा महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ५ हजार ५४९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरील १३५ रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी १० हजार १० रुग्णांना होम क्वारंन्टाईन करण्यात आलेले आहेत. दरम्यान, बाधित रुग्णांमध्ये साैम्य प्रकारची लक्षणे असलेली रुग्णांची संख्या ३५० आहे. महानगरातील पाॅझिटिव्हिटी रेट हा ७० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने रविवारी वगळता अन्य दिवशी दररोज बाधितांची सरासरी ३०० ते ४०० अहवाल तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नोंव्हेबर महिन्यात जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे दिवसभरात सरासरी १ ते ५ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह येत होते. बाधितांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नियंत्रणात होती. त्यामुळे कोरोना संपला असे वाटत होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बाधितांची शंभरीपार केली होती. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होतो. रुग्ण संख्या सर्वाधिक
मात्र कंटेनमेन्ट झोन नाही
महानगरासह चार ही तालुक्यात काेरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी महानगरात एकाही ठिकाणी कंटेनमेन्ट झोन दिसून येत नाही. सध्या कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर मनपा आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरात सॅनिटराझर केले जात आहे.
साैम्य लक्षणांचे कारणे
सध्या हवामान बदलामुळे सर्दी, खाेकला, ताप, अंगदुखी अशा प्रकारचे व्याधी सध्या नागरिकांमध्ये दिसून येत आहे. औषधी विक्रेत्यांकडून कोणत्या तरी गोळ्या घ्यायच्या आणि अंगावर काढायचे याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कोरोना तपासणी केली जात नाही. काेराेना तपासणी केल्यावर अहवाल पाॅझिटिव्ह येणार अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग दिवसेेंदिवस वाढत आहे.