शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

आता चोरटे अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST

धुळे शहरात गेल्या आठवड्यात प्रातांधिकारी भीमराज दराडे आणि त्याआधी पोलीस निरीक्षकांच्या घरावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली. ...

धुळे शहरात गेल्या आठवड्यात प्रातांधिकारी भीमराज दराडे आणि त्याआधी पोलीस निरीक्षकांच्या घरावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली. शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यात देवपूर परिसरात दोन आणि शहरात एक घराचा समावेश आहे. या घटना पाहता शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. त्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होते.

प्रातांधिकारी भीमराज दराडे यांच्या घरासमोरच अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे घर आहे. घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा असतो. असे असताना समोरच राहणाऱ्या प्रातांधिकारी यांच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला. चोरी कितीची झाली, हा गौण भाग आहे. पण घराबाहेर दिव्याची गाडी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे घर असताना चोरट्यांनी न घाबरता हात साफ केला. त्याआधी चोरट्यांसाठी कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या घरावरच चोरट्यांनी हात साफ केला. या दोन्ही घटनांचा विचार केला तर शहरात पोलीस अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांचे घर सुरक्षित नाही, मग सर्वसामान्य जनतेचा तर विचार न केलेलाच बरा, असेच म्हणावे लागेल.

दिवसाढवळ्या घरात चोरी करण्याच्या घटनाही वाढतच चालेल्या आहेत. देवपुरात दोन आणि धुळ्यातील मिल परिसरात गेल्या एक ते दीड महिन्याच्या काळात अशा चोऱ्या झाल्या आहेत.

अन्य जिल्ह्यात विकासाचा आलेख वाढताना दिसतो. याउलट धुळ्यात मात्र खून, लूट, मोटारसायकल चोरी, घरफोडी सारख्या वाढत्या घटनांमुळे गुन्हेगारीचा आलेख हा वाढताना दिसत आहे.

मोटारसायकल चोरीची घटना तर आता सायकल चोरीसारखीच झाली आहे. मोटारसायकल चोरी झाल्यानंतर लगेच त्याची फिर्याद घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. आधी नातेवाईकांकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घ्या, असा सल्ला दिला जातो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तरीही नाही सापडली तर मग आठ - दहा दिवसांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होतात. त्यांचा शोध मग केव्हा लागेल, हे सांगणेच नको.

असे नाही की पोलिसांनी गुन्ह्याचा शोध घेतला नाही. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात पोलिसांनी मोटारसायकल चोरीसह अन्य चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

मुंबई पोलिसांची बनावट पिस्तुलची कारवाई - जिल्ह्यात सुरू असलेले बनावट दारूचे मिनी कारखाने पोलिसांनी ध्वस्त केले. तसेच बनावट पिस्तूलही पकडल. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बनावट पिस्तूलप्रकरणी विशेष मोहीमही राबविली होती. त्यात अनेकांना अटक करून पिस्तूल हस्तगत करण्यात यशही आले होते. पण असे असताना गेल्या आठवडयात मुंबई पोलिसांचे एक पथक धुळ्यात आले. त्यांनी येथून एकाला बनावट पिस्तुलासह पकडले. या प्रकरणात पोलीस बाॅयसह खाकीतील काही कर्मचारी आणि अधिकारीही ‘इन्व्हाॅल’ असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांची मुंबई पोलीस गेल्या तीन दिवसापासून चौकशी करत असल्याचीही पोलीस वर्तुळात चर्चा आहे.

गांजाची शेती - जिल्ह्यात मध्यप्रदेशाच्या सीमेवर सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात गांजाची शेती केली जाते. त्या अतिदुर्गम भागापर्यंत पोलीस अधीक्षक हे पायी पोहचले होते. ती सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात आणि सीमेवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर लाखोंचा गांजाही जप्त केला होता. परंतु नंतर गांजाच्या शेतीत काही खाकीतील लोक पार्टनर असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. त्यानंतर या प्रकरणाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला.

शहरातून विविध गुन्ह्यांतील गुंडांना तडीपार करण्याचा धडाका कोरोना काळाआधी पोलिसांनी लावला होता. यामुळे नक्कीच शहरातील गुंडगिरी व गुन्हेगारीवर आळा बसेल, असा विश्वास नागरिकांना होता. पोलिसांच्या कामगिरीवर नागरिक खूश होते. परंतु झाले उलटच तडीपार झालेले गुंड सर्रासपणे शहरात फिरताना दिसू लागले. मग अशा तडीपार झालेल्या गुंडांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. मात्र, तडीपार गुंडांची शहरात येण्याची हिंमतच कशी होते, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला होता.

या सर्वांमागे एक कारण मुख्य आहे की, जिल्ह्यात खाकीची आधी असलेली जरब आता दिसत नाही. ती जरब पुन्हा निर्माण करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता कुठल्याही गुन्ह्यातील जे दोषी आहे, मग ते कोणीही असोत, त्यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहीजे. शहरात सर्व कायदे धाब्यावर बसवून कोणालाही न घाबरता कानठळ्या फोडणारे सायलन्सरचे फटाके फोडत बुलेटवर सुसाट वेगाने जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली पाहीजे. कर्तव्य बजाविताना कोणावर गय करता कामा नये, असे केले तरच पोलिसांची प्रतिष्ठा वाढून पुन्हा गुंडामध्ये आणि दादा लोकांच्या मनात जरब निर्माण होऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा चांगली होईल.