शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आता सकाळीच अकराच्या आत.... घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

शासकीय बैठकीत निर्णय किराणा खरेदी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिक दिवसभर फिरताना दिसतात. त्यावर पायबंद घालण्यासाठी राज्य स्तरावरुन कठोर निर्णय ...

शासकीय बैठकीत निर्णय

किराणा खरेदी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिक दिवसभर फिरताना दिसतात. त्यावर पायबंद घालण्यासाठी राज्य स्तरावरुन कठोर निर्णय घेतला जावा त्यासाठी राज्यातील किराणा दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ यावेळेत सुुरु ठेवण्याचा निर्णय घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरु झाली आहे.

आदेशाची अंमलबजावणी सुरु

सकाळी ७ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत किराणा, भाजीपालासह सर्व दुकाने सुरळीत सुरु राहतील. पण, त्यानंतर अत्यावश्यक सेवेत मेडिकल, दवाखाना वगळता सर्वच बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून पारित होताच पोलीस रस्त्यावर उतरले. महात्मा गांधी पुतळ्यापासून दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत पाचकंदिल चौकासह त्याच्याही पुढे हा ताफा रवाना झाला. दुकानांसह भाजीपाला आणि फळविक्रेत्यांसह सर्व लोटगाडीधारकांना हटविण्यात आले. हीच मोहीम आग्रा रोडसह अन्य ठिकाणी राबविण्यात आल्याने सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद करण्यात आल्यामुळे शुकशुकाट पसरला.

पाचकंदिलही शांत

सकाळपासून गजबजणारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला पाचकंदिल चौकाने सकाळी साडेअकरा वाजेनंतर मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. नाहीतर याच चौकात भाजी विक्रेते, फळ विक्रेते, शहरानजिकच खेडे गावात जाण्यााठी रिक्षा यांची वर्दळ दिवसभर सुरु असते. शहरातील बहुतेक जणांना पाचकंदिल चौकात येऊन खरेदी केल्याचे समाधान मिळत नाही. दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असताना खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना देखील पिटळण्यात आले.

नागरिकांची भटकंती थांबली

१५ एप्रिल पासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. अत्यावश्यक सुविधांना त्यातून वगळले होते. मात्र विनाकारण फिरणारे अत्यावश्यक सुविधांची ढाल वापरत दिवसभर भटकंती करताना दिसत होते. एखाद्या दवाखान्याची फाईल अथवा पिशवी घेवून दवाखान्यात चाललो, औषधी गोळ्या घ्यायच्या आहेत, बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी चाललो अशी काही कारणे पुढे करुन बहुतेेकांची भटकंती सुरु होती. परिणामी लावण्यात आलेला लॉकडाऊन केवळ नावालाच होता. सोमवारी राज्य शासनाने निर्बंध अधिक कडक करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुकानांसाठी सकाळी ते ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ११ वाजेनंतर शुकशुकाट होण्यास सुरुवात झाली. नागरिकांची विनाकारण होणारी भटकंतीही थांबली.

पाेलीस बंदोबस्त

शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे व विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षकांसह अन्य अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरुन बंदचे आवाहन केले. परिणामी सकाळी ११ वाजेनंतर सर्वत्र शुकशुकाट होण्यास सुरुवात झाली होती.

व्यापाऱ्यांनीही दिला प्रतिसाद

सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व सुरु राहील त्यानंतर दुकाने बंद करण्याचे आदेश पारीत झाल्यानंतर आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला. आपापली दुकाने बंद करुन घरी राहणे पसंत केले. परिणामी गजबजणारी ठिकठिकाणची बाजारपेठ दुपारपर्यंत शांत झाली होती.