शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
3
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
4
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
5
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
6
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
8
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
9
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
10
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
11
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
12
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
13
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
14
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
15
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
16
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
17
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
18
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
19
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
20
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

सूचना- ई पास अर्ज वेबसाइट इंग्रजीत टाईप करून घेणे. उर्वरित बातमी वाचली आहे.--- ई-पाससाठी दोनच कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे़ सध्या शिरपुरातून बाहेर ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे़ सध्या शिरपुरातून बाहेर जाण्यासाठी ई-पाससाठी अर्ज केले जात आहेत़ गेल्या आठ दिवसांमध्ये शिरपुरातून पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी जाण्यासाठी २३ लोकांचे ई-पाससाठी अर्ज आले होते़ त्या सर्वांचे योग्य कारण असल्यामुळे त्यांना ई-पास देण्यात आला आहे़ सदर सुविधा आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी आर. सी़ पटेल मेन बिल्डिंगमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी मोफत ई-पास सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़

८ दिवसात आलेले अर्ज

२३

आतापर्यंत दिले ई-पास

२३

प्रलंबित

ही कागदपत्रे हवीत

लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल, हॉस्पिटलचे काम असेल तर त्याची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, प्रत्येकाचे आधारकार्ड ही कागदपत्रे जोडावी लागतात़

२४ ते ४८ तासांत

मिळू शकतो पास

ई-पास साठी अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते़ तसेच जोडलेली कागदपत्रे जर योग्य असतील तर प्रवासाच्या तारखेपर्यंत ४८ ते २४ तास अगोदर मंजुरी दिली जाते़

प्रवासासाठीची कारणे

ई-पास साठी अर्ज करतांना नागरिक रूग्णालयात नातेवाईकाला पाहण्यास जाण्यासाठी, जवळचे व लांबच्या नातेवाईकांचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी तर काही लोक कामाला जाण्याकरिता अर्ज करत आहेत़ एकंदरीत हीच कारणे जास्त करून ई-पाससाठी दिली जात आहेत़

नाकाबंदी दरम्यान ई-पासची विचारणा होते

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली आहे़ जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना ठिकठिकाणी असलेल्या नाकाबंदीला सामोरे जावे लागते़ शिवाय जिथे जिल्हा प्रवेश होतो, तेथेही स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते़ नाकाबंदी दरम्यान संबंधित पोलीस स्थानकाचा ई-पास आहे का याची पाहणी केली जाते़

ई-पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी ूङ्म५्र.िेँस्रङ्म’्रूी.्रल्ल या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा़ त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायाचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी़