शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सूचना- ई पास अर्ज वेबसाइट इंग्रजीत टाईप करून घेणे. उर्वरित बातमी वाचली आहे.--- ई-पाससाठी दोनच कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे़ सध्या शिरपुरातून बाहेर ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे़ सध्या शिरपुरातून बाहेर जाण्यासाठी ई-पाससाठी अर्ज केले जात आहेत़ गेल्या आठ दिवसांमध्ये शिरपुरातून पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी जाण्यासाठी २३ लोकांचे ई-पाससाठी अर्ज आले होते़ त्या सर्वांचे योग्य कारण असल्यामुळे त्यांना ई-पास देण्यात आला आहे़ सदर सुविधा आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी आर. सी़ पटेल मेन बिल्डिंगमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी मोफत ई-पास सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़

८ दिवसात आलेले अर्ज

२३

आतापर्यंत दिले ई-पास

२३

प्रलंबित

ही कागदपत्रे हवीत

लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल, हॉस्पिटलचे काम असेल तर त्याची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, प्रत्येकाचे आधारकार्ड ही कागदपत्रे जोडावी लागतात़

२४ ते ४८ तासांत

मिळू शकतो पास

ई-पास साठी अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते़ तसेच जोडलेली कागदपत्रे जर योग्य असतील तर प्रवासाच्या तारखेपर्यंत ४८ ते २४ तास अगोदर मंजुरी दिली जाते़

प्रवासासाठीची कारणे

ई-पास साठी अर्ज करतांना नागरिक रूग्णालयात नातेवाईकाला पाहण्यास जाण्यासाठी, जवळचे व लांबच्या नातेवाईकांचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी तर काही लोक कामाला जाण्याकरिता अर्ज करत आहेत़ एकंदरीत हीच कारणे जास्त करून ई-पाससाठी दिली जात आहेत़

नाकाबंदी दरम्यान ई-पासची विचारणा होते

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली आहे़ जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना ठिकठिकाणी असलेल्या नाकाबंदीला सामोरे जावे लागते़ शिवाय जिथे जिल्हा प्रवेश होतो, तेथेही स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते़ नाकाबंदी दरम्यान संबंधित पोलीस स्थानकाचा ई-पास आहे का याची पाहणी केली जाते़

ई-पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी ूङ्म५्र.िेँस्रङ्म’्रूी.्रल्ल या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा़ त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायाचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी़