शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

विचारांसाठी जोखीम घेण्याची गरज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:14 IST

उत्तम कांबळे : कॉ.अण्णाभाऊ साठे दहावे साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात प्रतिपादन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विचार करण्यासाठी जोखीम उचलण्याची गरज आहे. कॉ.गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, एम. कलबुर्गी यांनी ती घेतली होती, असे सांगून विचार करणारा एकदाच मारला जातो. परंतु न विचार करणारा हा मेल्यासारखाच असतो, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संमेलनाच्या राज्य संयोजन समिती सदस्य उत्तम कांबळे यांनी रविवारी येथे केले.  या साहित्य संमेलनासाठी वेगवेगळी पार्श्वभूमी लागते, अण्णाभाऊ निमित्त असतात असे सांगून नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे तयार झालेल्या नव्या राजकारणाची पार्श्वभूमी यावेळी लाभल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही, राजकारण, समाजकारणाने यू टर्न घेतला आहे. नियुडणुकांचा निकाल पाहता त्यांचे ८० वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. धक्कादायक हा टर्न देण्याचे काम ज्यांनी केले त्या मतदारांना सुजाण करण्याबाबत आपणास अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट होते, असेही कांबळे यांनी नमूद केले. मात्र बदल हा नियम असून कोणतेही संकट कायमसाठी येत नाही. त्यामुळे ज्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला, होतो आहे त्यांना हा बदलाचा विश्वास द्यालया हवा, असेही ते म्हणाले. येथील हे अधिवेशन खºया अर्थाने  राज्य व राष्टÑीयस्तरीय झाले. राज्यातील बार्शी, मुंबई, औरंगाबाद अशा विविध भागातून लोक, कार्यकर्ते येथे आले.कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांसह संमेलनासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा कांबळे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात गोपाळ निंबाळकर, आबासाहेब थोरात, नवल पाटील, सुरेश बिºहाडे, प्रा.सुनिता पाटील, भाऊसाहेब वानखेडे, दीपक बैसाणे, जयश्री ठाकरे,उर्मिला वाघ, प्रतिमा मोरे, मोहन मगरे आदींचा समावेश होता. यावेळी रवींद्र वाकळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा मान्यवरांना भेटीदाखल देण्यात आल्या. आभार उषा वाघ यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे