शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 11:52 IST

अतुल जोशी

महानगरपालिका निवडणूक म्हणजे आगामी काळात होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला सर्वच जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत. काही प्रभागात तर उमेदवारच मिळालेले नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आगामी काळात होणाºया  निवडणुकीत स्वबळावर यश मिळविण्यासाठी शिवसेनेला शहरासह जिल्हयात आतापासून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल हे निश्चित.केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी यापुढील काळात होणाºया सर्वच निवडणुका स्वबळावरच लढून आपली ताकद अजमावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.  दोन वर्षांपूर्वी पक्षाने  बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना   पद दिले. त्यांच्या काळात पक्षाचे संघटन पाहिजे त्या प्रमाणात विस्तारले नाही अशी चर्चा खुद्द शिवसेनेतील काही पदाधिकारी खाजगीत करतात. त्यांच्याकाळात संघटना बांधणीकडे, नवीन शाखा सुरू करण्याकडे ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होते, तसे न होऊ शकल्याने, त्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार मिळण्यावर झाला. पक्षाकडे  मनपाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या अर्जांची भाऊगर्दी झालेली असली तरी एकाच प्रभागातून दोन-तीन जण इच्छूक असल्याने, अर्जाचा आकडा मोठा दिसत होता. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला ७४ जागांपैकी फक्त ५० जागांवरच उमेदवार मिळाले. त्यातही विद्यमान नगरसेवकांपैकी फक्त तिघांनीच मुलाखती दिल्या. मुस्लिम बहूल भागात उमेदवार मिळाले नाहीत. तर आठ प्रभागांमध्ये चार-चार उमेदवारही मिळाले नाही, हे उमेदवारी यादीवरून स्पष्ट होते. पक्षाच्या पदाधिकाºयांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत शहरात दोनवेळा येऊन गेले. तर जिल्हा संपर्क प्रमुख के.पी.नाईक यांचाही सारखा दौरा असतो. असे असतांनाही पक्षाला पुरेसे उमेदवार मिळू नयेत  याचे चिंतन  करून संघटनात्मक बांधणी किती करणे गरजेचे आहे, याचा विचार पक्षातील पदाधिकाºयांनी करणे गरजेचे झालेले आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचेच नाही तर अवघ्या महाराष्टÑाचे लक्ष लागून आहे. कारण ही निवडणूक शिवसेनेसाठी आगामी निवडणुकीची रंगीत तालीम आहे. लोकसभेची निवडणूक चार-पाच महिन्यांवर येऊन ठेवली आहे. त्यापाठोपाठ विधानसभेचीही निवडूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये   सेनेला यश मिळवायचे असेल तर संघटनेचे जाळे मजबूत असणे गरजेचे आहे. तरच जी अपेक्षा आहे, ती पूर्ण होऊ शकेल.  महागरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या दोन गटांसह कॉँग्रेस-राष्टÑवादी व इतर लहान-लहान पक्षांशी शिवसेनेचा  ‘सामना’ आहे. या निवडणुकीत आपली ताकद, वर्चस्व सिद्ध करून दाखविण्याची शिवसेनेला संधी मिळाली असून, या संधीचे सोने करून घेण्यात पक्ष कितपत यशस्वी ठरतो, ते निकालानंतर स्पष्ट होईल. जनमताचा अंदाजही निकालानंतरच समजेल. आगामी काळ हा निवडणुकांचाच असल्याने, त्यात यश मिळविण्यासाठी पक्षाने संघटनाबांधणीकडे लक्ष देणे आतापासून गरज निर्माण झाली आहे. यात पक्षाचे पदाधिकारी कितपत यशस्वी होतात, ते येणाºया काळात समजणार आहे.

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक