शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 11:52 IST

अतुल जोशी

महानगरपालिका निवडणूक म्हणजे आगामी काळात होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला सर्वच जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत. काही प्रभागात तर उमेदवारच मिळालेले नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आगामी काळात होणाºया  निवडणुकीत स्वबळावर यश मिळविण्यासाठी शिवसेनेला शहरासह जिल्हयात आतापासून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल हे निश्चित.केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी यापुढील काळात होणाºया सर्वच निवडणुका स्वबळावरच लढून आपली ताकद अजमावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.  दोन वर्षांपूर्वी पक्षाने  बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना   पद दिले. त्यांच्या काळात पक्षाचे संघटन पाहिजे त्या प्रमाणात विस्तारले नाही अशी चर्चा खुद्द शिवसेनेतील काही पदाधिकारी खाजगीत करतात. त्यांच्याकाळात संघटना बांधणीकडे, नवीन शाखा सुरू करण्याकडे ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होते, तसे न होऊ शकल्याने, त्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार मिळण्यावर झाला. पक्षाकडे  मनपाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या अर्जांची भाऊगर्दी झालेली असली तरी एकाच प्रभागातून दोन-तीन जण इच्छूक असल्याने, अर्जाचा आकडा मोठा दिसत होता. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला ७४ जागांपैकी फक्त ५० जागांवरच उमेदवार मिळाले. त्यातही विद्यमान नगरसेवकांपैकी फक्त तिघांनीच मुलाखती दिल्या. मुस्लिम बहूल भागात उमेदवार मिळाले नाहीत. तर आठ प्रभागांमध्ये चार-चार उमेदवारही मिळाले नाही, हे उमेदवारी यादीवरून स्पष्ट होते. पक्षाच्या पदाधिकाºयांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत शहरात दोनवेळा येऊन गेले. तर जिल्हा संपर्क प्रमुख के.पी.नाईक यांचाही सारखा दौरा असतो. असे असतांनाही पक्षाला पुरेसे उमेदवार मिळू नयेत  याचे चिंतन  करून संघटनात्मक बांधणी किती करणे गरजेचे आहे, याचा विचार पक्षातील पदाधिकाºयांनी करणे गरजेचे झालेले आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचेच नाही तर अवघ्या महाराष्टÑाचे लक्ष लागून आहे. कारण ही निवडणूक शिवसेनेसाठी आगामी निवडणुकीची रंगीत तालीम आहे. लोकसभेची निवडणूक चार-पाच महिन्यांवर येऊन ठेवली आहे. त्यापाठोपाठ विधानसभेचीही निवडूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये   सेनेला यश मिळवायचे असेल तर संघटनेचे जाळे मजबूत असणे गरजेचे आहे. तरच जी अपेक्षा आहे, ती पूर्ण होऊ शकेल.  महागरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या दोन गटांसह कॉँग्रेस-राष्टÑवादी व इतर लहान-लहान पक्षांशी शिवसेनेचा  ‘सामना’ आहे. या निवडणुकीत आपली ताकद, वर्चस्व सिद्ध करून दाखविण्याची शिवसेनेला संधी मिळाली असून, या संधीचे सोने करून घेण्यात पक्ष कितपत यशस्वी ठरतो, ते निकालानंतर स्पष्ट होईल. जनमताचा अंदाजही निकालानंतरच समजेल. आगामी काळ हा निवडणुकांचाच असल्याने, त्यात यश मिळविण्यासाठी पक्षाने संघटनाबांधणीकडे लक्ष देणे आतापासून गरज निर्माण झाली आहे. यात पक्षाचे पदाधिकारी कितपत यशस्वी होतात, ते येणाºया काळात समजणार आहे.

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक