शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 11:52 IST

अतुल जोशी

महानगरपालिका निवडणूक म्हणजे आगामी काळात होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला सर्वच जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत. काही प्रभागात तर उमेदवारच मिळालेले नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आगामी काळात होणाºया  निवडणुकीत स्वबळावर यश मिळविण्यासाठी शिवसेनेला शहरासह जिल्हयात आतापासून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल हे निश्चित.केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी यापुढील काळात होणाºया सर्वच निवडणुका स्वबळावरच लढून आपली ताकद अजमावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.  दोन वर्षांपूर्वी पक्षाने  बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना   पद दिले. त्यांच्या काळात पक्षाचे संघटन पाहिजे त्या प्रमाणात विस्तारले नाही अशी चर्चा खुद्द शिवसेनेतील काही पदाधिकारी खाजगीत करतात. त्यांच्याकाळात संघटना बांधणीकडे, नवीन शाखा सुरू करण्याकडे ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होते, तसे न होऊ शकल्याने, त्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार मिळण्यावर झाला. पक्षाकडे  मनपाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या अर्जांची भाऊगर्दी झालेली असली तरी एकाच प्रभागातून दोन-तीन जण इच्छूक असल्याने, अर्जाचा आकडा मोठा दिसत होता. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला ७४ जागांपैकी फक्त ५० जागांवरच उमेदवार मिळाले. त्यातही विद्यमान नगरसेवकांपैकी फक्त तिघांनीच मुलाखती दिल्या. मुस्लिम बहूल भागात उमेदवार मिळाले नाहीत. तर आठ प्रभागांमध्ये चार-चार उमेदवारही मिळाले नाही, हे उमेदवारी यादीवरून स्पष्ट होते. पक्षाच्या पदाधिकाºयांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत शहरात दोनवेळा येऊन गेले. तर जिल्हा संपर्क प्रमुख के.पी.नाईक यांचाही सारखा दौरा असतो. असे असतांनाही पक्षाला पुरेसे उमेदवार मिळू नयेत  याचे चिंतन  करून संघटनात्मक बांधणी किती करणे गरजेचे आहे, याचा विचार पक्षातील पदाधिकाºयांनी करणे गरजेचे झालेले आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचेच नाही तर अवघ्या महाराष्टÑाचे लक्ष लागून आहे. कारण ही निवडणूक शिवसेनेसाठी आगामी निवडणुकीची रंगीत तालीम आहे. लोकसभेची निवडणूक चार-पाच महिन्यांवर येऊन ठेवली आहे. त्यापाठोपाठ विधानसभेचीही निवडूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये   सेनेला यश मिळवायचे असेल तर संघटनेचे जाळे मजबूत असणे गरजेचे आहे. तरच जी अपेक्षा आहे, ती पूर्ण होऊ शकेल.  महागरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या दोन गटांसह कॉँग्रेस-राष्टÑवादी व इतर लहान-लहान पक्षांशी शिवसेनेचा  ‘सामना’ आहे. या निवडणुकीत आपली ताकद, वर्चस्व सिद्ध करून दाखविण्याची शिवसेनेला संधी मिळाली असून, या संधीचे सोने करून घेण्यात पक्ष कितपत यशस्वी ठरतो, ते निकालानंतर स्पष्ट होईल. जनमताचा अंदाजही निकालानंतरच समजेल. आगामी काळ हा निवडणुकांचाच असल्याने, त्यात यश मिळविण्यासाठी पक्षाने संघटनाबांधणीकडे लक्ष देणे आतापासून गरज निर्माण झाली आहे. यात पक्षाचे पदाधिकारी कितपत यशस्वी होतात, ते येणाºया काळात समजणार आहे.

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक