शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

आहे त्या जि.प.शाळांकडे लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:46 IST

आॅनलाइन लोकमत अतुल जोशी धुळे -सत्तांतर झाले की धोरणे बदलता, निर्णय बदलतात. याचा प्रत्यय आता राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतही येऊ ...

आॅनलाइन लोकमतअतुल जोशीधुळे-सत्तांतर झाले की धोरणे बदलता, निर्णय बदलतात. याचा प्रत्यय आता राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतही येऊ लागला आहे.नवीन पदाधिकारी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काही गोष्टींना नव्याने सुरूवात केली आहे. चांगल्या गोष्टींचे स्वागतच करायला पाहिजे. मात्र हे करत असतांना काही गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. जे सुरू करणार आहोत तेथील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचाही अभ्यास होणे गरजेचे असते. तसे केल्यास घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सोयीचे होते. केवळ ‘राजा बोले दल हाले’अशी स्थिती नसावी. सांगण्याचा उद्देश असा की जिल्हा परिषदेने नुकताच जिल्ह्यातील दहा शाळा इंटरनॅशनल करण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. गरीब, कष्टकऱ्यांच्या मुलांनाही गुणवत्तापूर्ण, उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांच्या स्थितीचाही विचार करणे गरजेचे आहे. तीन वर्षांपूर्वी जिल्हयातील शाळा ‘डिजीटल’ करण्याचा निर्णय झाला. लोकसहभागातून या शाळा डिजीटल झाल्या. राज्यात सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ११०४ शाळा डिजीटल करण्याचा बहुमान धुळे जिल्ह्याला मिळाला. सुरवातीला विद्यार्थ्यांना डिजीटलच्या माध्यमातून शिक्षण मिळू लागले. मात्र अवघ्या दोन वर्षातच डिजीटल शाळांचे काय झाले हे सर्वज्ञात आहे. ग्रामीण भागातील शाळा विजेचे बिल भरू शकत नसल्याने, अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे डिजीटल साधने केवळ नावालाच उरलेली आहेत. केवळ डिजीटलचाच प्रश्न नाही. तर अनेक जिल्हा परिषद शाळाच्या खोल्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी, शाळांना भौतिक सुविधा देण्याचे, तसेच वीज पुरवठा खंडीत झालेल्या शाळांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न न करता थेट इंटरनॅशनल शाळा करण्याचा निर्णय तसा धाडसीच म्हणावा लागेल.या इंटरनॅशनल दर्जाच्या शाळेचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र आंतरराष्टÑीयप्रमाणेच येथे सर्वसोयीसुविधा असतील का? त्या दर्जाचचे शिक्षक उपलब्ध करून दिले जातील का? हा प्रश्न आहे. हे करीत असतांना आहे त्या शाळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर एकीकडे शाळा आंतरराष्टÑीय दर्जाचा होत राहतील अन दुसरीकडे दुर्गम भागातील शाळा ओस पडतील असे होता कामा एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे