शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आहे त्या जि.प.शाळांकडे लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:46 IST

आॅनलाइन लोकमत अतुल जोशी धुळे -सत्तांतर झाले की धोरणे बदलता, निर्णय बदलतात. याचा प्रत्यय आता राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतही येऊ ...

आॅनलाइन लोकमतअतुल जोशीधुळे-सत्तांतर झाले की धोरणे बदलता, निर्णय बदलतात. याचा प्रत्यय आता राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतही येऊ लागला आहे.नवीन पदाधिकारी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काही गोष्टींना नव्याने सुरूवात केली आहे. चांगल्या गोष्टींचे स्वागतच करायला पाहिजे. मात्र हे करत असतांना काही गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. जे सुरू करणार आहोत तेथील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचाही अभ्यास होणे गरजेचे असते. तसे केल्यास घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सोयीचे होते. केवळ ‘राजा बोले दल हाले’अशी स्थिती नसावी. सांगण्याचा उद्देश असा की जिल्हा परिषदेने नुकताच जिल्ह्यातील दहा शाळा इंटरनॅशनल करण्याचा एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.गेल्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. गरीब, कष्टकऱ्यांच्या मुलांनाही गुणवत्तापूर्ण, उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांच्या स्थितीचाही विचार करणे गरजेचे आहे. तीन वर्षांपूर्वी जिल्हयातील शाळा ‘डिजीटल’ करण्याचा निर्णय झाला. लोकसहभागातून या शाळा डिजीटल झाल्या. राज्यात सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ११०४ शाळा डिजीटल करण्याचा बहुमान धुळे जिल्ह्याला मिळाला. सुरवातीला विद्यार्थ्यांना डिजीटलच्या माध्यमातून शिक्षण मिळू लागले. मात्र अवघ्या दोन वर्षातच डिजीटल शाळांचे काय झाले हे सर्वज्ञात आहे. ग्रामीण भागातील शाळा विजेचे बिल भरू शकत नसल्याने, अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे डिजीटल साधने केवळ नावालाच उरलेली आहेत. केवळ डिजीटलचाच प्रश्न नाही. तर अनेक जिल्हा परिषद शाळाच्या खोल्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी, शाळांना भौतिक सुविधा देण्याचे, तसेच वीज पुरवठा खंडीत झालेल्या शाळांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न न करता थेट इंटरनॅशनल शाळा करण्याचा निर्णय तसा धाडसीच म्हणावा लागेल.या इंटरनॅशनल दर्जाच्या शाळेचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र आंतरराष्टÑीयप्रमाणेच येथे सर्वसोयीसुविधा असतील का? त्या दर्जाचचे शिक्षक उपलब्ध करून दिले जातील का? हा प्रश्न आहे. हे करीत असतांना आहे त्या शाळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर एकीकडे शाळा आंतरराष्टÑीय दर्जाचा होत राहतील अन दुसरीकडे दुर्गम भागातील शाळा ओस पडतील असे होता कामा एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे