शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेतकऱ्यांच्या विविध योजनेत सुसुत्रता आणण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 22:09 IST

कृषी राज्यमंत्र्यांना निवेदन : अनुषंगिक केली सविस्तर चर्चा

धुळे : शेतकऱ्यांचे शेती विषयक अडचणी, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अडचणी, शासनाच्या विविध योजनेत सुधारणा करून योजनेत सुसुत्रता आणण्यासाठी पढावद (धुळे) येथिल कृषी भूषण अ‍ॅड़ प्रकाश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने कृषी राज्यमंत्री दादा भूसे यांची भेट घेतली़ त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना निवेदन सादर केले़शिवसेना जिल्हा संघटक मंगेश पवार, भाईदास पाटील विजय शिसोदे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी किरण पवार, बाळु धारकर, कारभारी मनगटे, अशोक पाटील, राहुल पाटील, मनोज पाटील व इतर ही शेतकरी उत्पादक कंपनी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकºयांना कृषी पंपासाठी २४ तास विज उपलब्ध करून दिली तर, शासनावर विशेष आर्थिक भार न पडता, जास्त वीज व भुगर्भातील पाण्याचा उपसा होणार नाही़ सर्वांना फायदा होईल. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत बदल करुन जुन्या मानकानुसारच नुकसान भरपाई मंजुर करावी, याबाबत निवेदन दिले. त्यानुसार मंत्री भूसे म्हणाले, हा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतला आहे. व त्यानुसार विमा कंपनीला दिलेले टेंडर रद्द करुन नविन प्रक्रीया सुरू केली आहे. नविन मानकात बदल केला जात आहे. विविध योजना स्थानिक गरजेनुसार चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत शेतकºयांना बियाणे अनुदानावर दिले जाते. हे आतापर्यंत महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत दिले जात होते. मात्र दोन वर्षापुर्वी शासनाने निर्णय घेऊन शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत अनुदान बंद केले. तसेच प्रमाणित बियाणे उत्पादन अनुदान शेतकºयांना दिले जात होते. परंतु कोरोनोच्या पार्श्वभूमीवर हे दिले गेले नाही. ते अनुदान भविष्यात निधी उपलब्ध झाल्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुध्दा देणेबाबत होकार दिला. केंद्र सरकारने महाराष्ट्रात बिजोत्पादन करणाºया ४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रत्येकी ६० लाख मर्यादेपर्यत अनुदान मंजुर करुन निधी राज्य सरकारकडे दिलेले आहेत. परंतु वित्त विभागाच्या लाल फितीच्या कारभारामुळे हा निधी कृषी विभागाला लगेच वित विभाग देत नसल्याने ही कामे पुर्ण होऊ शकली नाहीत. हा निधी वित्त विभागाकडुन लवकर प्राप्त करून कामे पुर्ण करण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले़

टॅग्स :Dhuleधुळे