शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राष्ट्रवादी, शिवसेनेचा ‘ईव्हीएम’वर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:05 IST

महापालिकेवर मोर्चा : भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह, फेरनिवडणूक घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीत अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभव करून नवखे उमेदवार जिंकले असून त्यामुळे मतदारच संभ्रमात पडले आहे़ भाजपने ‘ईव्हीएम’मध्ये गडबड केल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी, शिवसेनेतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला़ तसेच फेरनिवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली़‘ईव्हीएम’चा जाहीर निषेधप्रभाग ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर कांबळे, बानो बी लतीफ खाटीक, मंदाकिनी पाटील व कैलास चौधरी यांनी एकविरा देवी मंदिरापासून महापालिकेवर मोर्चा काढला़ मनपा निवडणूकीत उमेदवार विजयी झाले नसून ईव्हीएम विजयी झाल्याचा जाहीर निषेध अशा मजकुराचे पोस्टर मोर्चाच्या सुरूवातीस महिलांनी झळकवले होते़ या मोर्चात प्रभाग ४ मधील उमेदवारांसह शिवसेनेचे उमेदवार महेश मिस्तरी, राष्ट्रवादीचे उमेदवार रविंद्र आघाव, जितेंद्र शिरसाठ, संदीप पाटोळे, सुरेश बोरसे यांच्यासह विविध प्रभागातील पराभूत उमेदवार सहभागी झाले होते़ फेरनिवडणूकीची मागणीभाजपचे उमेदवार सक्षम नसतांना शिवाय मतदारांनी देखील त्यांना मतदान केलेले नसतांना भाजप विजयी  झालेच कसे? मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांना ५० जागा कशा मिळाल्या? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले़ तर मतमोजणीच्या ठिकाणी वायफाय सेवा बंद ठेवण्याची मागणी केलेली असतांना ती सुरू ठेवण्यात आली व ईव्हीएम हॅक करण्यात आल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला़ त्याचप्रमाणे मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचे नेटवर्क जाणीवपूर्वक जाम करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला़ महेश मिस्तरी यांनी, आपल्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ५० जागा भाजपने आधीच मॅनेज केल्याचे सांगितले़ शिवाय २५ लाख दिले तर ‘ईव्हीएम हॅक’ करून आपल्याला विजयी करू, असेही त्याने सांगितले असून आपल्याकडे त्याच्या संभाषणाचे  ‘रेकॉर्ड’ असल्याचे सांगितले़  मतमोजणीच्या दिवशी सकाळीच माझ्या प्रभागात चारही जागा भाजपच्या जिंकणार असल्याचे सांगण्यात आले, एकूणच ‘ईव्हीएम मॅनेज’ असल्याशिवाय असे होऊ शकत नाही, असे मिस्तरी यांनी स्पष्ट केले़ सर्व उमेदवारांनी बॅलेट पेपरव्दारे फेर निवडणूक घेण्याची मागणी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली़ याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविले जाईल, असे आयुक्त म्हणाले़ शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये ब या जागेवर उमेदवारी करणाºया उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या संख्येत व वैध मतांच्या संख्येत १ हजार मतांची तफावत येत असल्याची तक्रार या प्रभागातील उमेदवार राजश्री किशोर शिंदे यांनी आयुक्तांकडे केली़ वैध मतांमध्ये व उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये १ हजार मतांची तफावत असून निवडणूकीचा निकाल हा पारदर्शक नाही़ तरी याबाबत योग्य तो खुलासा करण्यात यावा, अन्यथा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे निवेदनात नमुद आहे़ भाजपचा नव्हे ‘ईव्हीएम’चा विजय़़़मनपा निवडणूकीत भाजपचा नव्हे तर ‘ईव्हीएम’चा विजय झाल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ जनतेला उमेदवारच माहित नसतांना हजारो मते कशी मिळू शकतात? भाजपने जनतेला केवळ बटन दाबण्याचे पैसे दिले़ कारण कोणतेही बटन दाबले तरी विजय आपलाच होणार, याची खात्री त्यांना होती़ प्रमुख विरोधी पक्ष असल्याने त्यांनी शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला़ एमआयएमला बळ देत राष्ट्रवादीला रोखले़  आम्ही व्हीव्हीपॅटच्या मागणीसाठी दाखल  केलेली याचिका अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे