शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 19:26 IST

विखरण : राजकारण केल्याचा प्रकल्पबाधित शेतकºयांकडून निषेध

ठळक मुद्देविखरण येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहनतत्पूर्वी या पुतळ्यास काठीने मारण्यात आले होतेयावेळी प्रकल्पबाधिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विखरण ता.शिंदखेडा येथील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजकारण करून स्थानिक आमदार तथा राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर बेछूट आरोप केल्याच्या निषेधार्थ विखरण गावाला प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी विखरण ग्रामपंचायतीच्या अंगणात पुतळयाला शेण मारून त्याचे दहन केले. दरम्यान, सर्व वृध्द शेतकºयांनी एकत्र येवून नवाब मलिक यांच्या पुतळ्याला हातातील काठीने बडवले. यावेळी प्रकल्प संघर्ष समितीचे शांताराम पाटील, विठ्ठल पाटील, विक्रम तायडे, शंकरसिंग गिरासे, विश्वास पाटील, जगन पाटील, विनायक पाटील, भानुदास पाटील, भिमसिंग गिरासे, राकेश पवार, दिलीप कोळी, जितेंद्र गिरासे, विनोद पाटील, निलेश सावळे, चुनिलाल पाटील, दंगल पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, नारायण पाटील यांच्यासह विखरण प्रकल्पात जमीन गेलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. प्रकल्प संघर्ष समितीचे शांताराम पाटील यावेळी म्हणाले की, प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकºयांना तत्कालीन जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी ८० हजार रुपये एकरी मोबदला शासकीय दरानुसार जाहीर केला  होता, त्यानंतर संघर्ष समितीसोबत लोकप्रतिनिधी जयकुमार रावल यांनी या दराला तीव्र विरोध केला. परंतु तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी, तुमची या प्रकल्पात जमीन नाही. त्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे आमच्यातील एका सहका-याने त्याच्या हिश्श्याची ५३ आर जमीन त्यांना देण्याचे ठरले म्हणून ती जमीन त्यांनी घेतली आहे. त्यात कोणताही गैरप्रकार नाही. धर्मा पाटील हे आमच्या संघर्षातील एक सहकारी होते. त्यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला, वास्तविक या सर्व प्रकाराला तत्कालीन सरकारच जबाबदार असल्याचा आरोप  संघर्ष समितीचे शांताराम पाटील यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी विठ्ठल पाटील, विक्रम तायडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.